One Nation One Election: 'मोदी दर्शनाला गेले आणि गणपती पावला केजरीवालांना..', उल्हास बापट असं का म्हणाले?

मुंबई तक

Ulhas Bapat on PM Modi: 'वन नेशन वन इलेक्शन' या विषयावर बोलताना घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपती दर्शनासाठी दिलेल्या भेटीचा दाखला देत मार्मिक टिप्पणी केली आहे.

ADVERTISEMENT

मोदी दर्शनाला गेले आणि गणपती पावला केजरीवालांना..'
मोदी दर्शनाला गेले आणि गणपती पावला केजरीवालांना..'
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वन नेशन वन इलेक्शनवरुन देशभरात जोरदार चर्चा

point

घटनातज्ज्ञ उल्हास बापटांची मोदी सरकारवर मार्मिक टिप्पणी

point

एकाच वेळी देशात निवडणुका घेणं शक्य होईल का?

Ulhas Bapat: पुणे: वन नेशन वन इलेक्शन यावरून आता देशभरात जोरदार चर्चा सुरू आहेत. देशात एकाच वेळेस सर्व राज्यात निवडणुका घेता याव्यात यासाठी मोदी सरकारने जी कोविंद समिती नेमली होती. तो अहवाल आता केंद्रीय कॅबिनेटने स्वीकारला आहे. पण याचबाबत बोलताना घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी एक मार्मिक अशी टिप्पणी केली आहे. (constitutional expert ulhas bapat poignant comment on prime minister modi while speaking on one nation one election)

वन नेशन वन इलेक्शन याचे राजकीय आणि घटनात्मकदृष्ट्या कसे पडसाद उमटणार यावर बोलताना उल्हास बापट यांनी सविस्तरपणे त्यांचं मत व्यक्त केलं. पण यावेळी त्यांनी अशी एक टिप्पणी केली ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

वन नेशन वन इलेक्शनवर उल्हास बापट नेमकं काय-काय म्हणाले?

प्रश्न: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका झालेल्या नाही. अशा परिस्थिती वन नेशन वन इलेक्शन शक्य आहे का? 

उल्हास बापट: तुम्हाला चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेता येत नसतील तर 28 राज्यांच्या निवडणुका तुम्ही कशा एकत्र घेऊ शकणार आहात? आपल्याकडे तेवढं लष्कर, पोलीस आहे का? सरकारी नोकर आहेत का? नाही... स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का झाल्या नाही? याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल. कारण त्या निवडणुका घेण्यात काहीही अडचण नव्हती. यामध्ये राजकीय प्रश्न अनेक उद्भवतात. 

हे वाचलं का?

    follow whatsapp