'मी कोणताही पक्ष बदललेला नाही', अजित पवार अचानक असं का म्हणाले?
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरद्वारे एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी राज्यातील अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसंच विरोधकांना टोलाही लगावला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'लाडकी बहीण' योजनेबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य
महिला सक्षमिकरणासह सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्याचा शासनाचा प्रयत्न
NCP : Ajit Pawar : लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय घटना घडामोडींना वेग आला आहे. सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होताना दिसत आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नव्या वक्तव्याची खूप चर्चा होत आहे. “राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही." असं ते म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरद्वारे एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी राज्यातील अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसंच विरोधकांना टोलाही लगावला आहे. ते म्हणाले, राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही. पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो आणि आजही जनतेचाच आहे.”
हेही वाचा : Team India: 'आली रे आली टीम इंडिया आली', जंगी स्वागतासाठी दणक्यात तयारी!
अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर अजित पवार नेमकं काय म्हणाले?
"माझ्या महाराष्ट्रवासियांनो, मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केलेला. तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच, राज्याचा अशा प्रकारचा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला सार्थ अभिमान आहे. या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जाणार आहे. या योजनेवर राज्य सरकार प्रतिवर्षी 46 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे." असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.
'लाडकी बहीण' योजनेबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य
"आजवर आपण पाहत आलोय की, प्रत्येक कुटुंबातील आई स्वत:वरील खर्चात शक्य तितकी काटकसर करते. पण आपल्या मुलाबाळांना काही एक कमी पडणार नाही याची काळजी ती घेत असते. परंतु काही वेळा परिस्थितीच अशी निर्माण होते की, आर्थिक अडचणींमुळे घरातील मुलांकडे जास्त लक्ष दिले जात आणि नेमके मुलींकडे दुर्लक्ष होते. मात्र आता मला आशा आहे की, माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थसहाय्यामुळे राज्यातील माता भगिनींची ही विवंचना निश्चित दूर होईल.










