पाकिस्तानमध्ये भूकंप भारताच्या हल्लामुळे होतोय?, ही आहे किराणा हिल्सची सगळी Inside स्टोरी!

निलेश झालटे

पाकिस्तानचा अण्वस्त्र साठा असलेल्या किराणा हिल्स येथे भारताने क्षेपणास्त्राने हल्ला केल्याचा आरोप पाकिस्तानकडून केला जात आहे. या सगळ्याची इनसाइड स्टोरी आपण जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

किराणा हिल्सची Inside स्टोरी!
किराणा हिल्सची Inside स्टोरी!
social share
google news

नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्सवर हल्ला केल्याचा दावा सोशल मीडियावर सातत्याने केला जात आहे. याचं सत्य काय आहे हे आपण जाणून घेऊया शिवाय किराणा हिल्स नेमकं काय आहे. पाकिस्तानच्या न्यूक्लिअर स्टोरेज सेंटरवर भारतानं हल्ला केलाय का, सरगोदामधील अण्वस्त्र साठ्यांवर भारतानं हल्ला केलाय का, पाकिस्तानात भूकंप येण्याची कारणं यामागेच आहेत का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.

पाकिस्तानने भारताच्या वेगवेगळ्या शहरांवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारताने त्यापेक्षा दुप्पट मोठा हल्ला पाकिस्तानवर चढवला. भारताने 9 आणि 10 मेच्या मध्यरात्री पाकिस्तानातील वेगवेगळ्या एअर बेसेसना लक्ष्य केलं. पाकिस्तानी एअर फोर्सचे आठ ते नऊ एअर बेस भारताने उडवून दिले. अगदी सरगोदापर्यंत हा एअर स्ट्राइक केला गेला. भारताने किराणा हिल्सवर हल्ला केल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली याचं कारण व्हायरल झालेला व्हिडीओ.  

DGMO च्या पत्रकार परिषदेत त्या संबंधी एका पत्रकाराने एअर मार्शल एके भारती यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी खूप गमतीतंच उत्तर दिलं.  भारती म्हणाले, “थँक्यू ही माहिती दिल्याबद्दल. किराणा हिल्स येथे पाकिस्तानाच अणवस्त्र साठ्याच तळ आहे, हे आम्हाला माहीत नव्हतं. पण आम्ही अशा कुठल्या ठिकाणी हल्ला केलेला नाही” 
 
सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक दाव्यांमध्ये पाकिस्तानकडून असा आरोप आहे की, भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानच्या सरगोदा येथील पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यांवर हल्ला केला. सरगोदा येथील मुशफ एअरबेस भारताच्या क्षेपणास्त्र लक्ष्यांपैकी एक असल्याचे बोललं जाऊ लागलेलं. मात्र  एअर मार्शल ए.के. भारती यांनी किराणा हिल्सवरील हल्ला केल्याच्या वृत्तांचे खंडन केलं.

हे ही वाचा>> जिथं पाकिस्ताननं हल्ला केल्याचा दावा केला, तिथंच PM मोदी पोहोचले... जवानांसोबत काय घोषणा दिल्या?

मुशफ एअरबेस आणि सरगोधा ही दोन्ही ठिकाणे एकमेकांपासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर आहेत, सोशल मीडियावरील या व्हिडिओंमध्ये दातेरी पर्वत शिखरांच्या पायथ्यापासून धुराचे दाट लोट उठताना दिसत आहेत. हायरिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा नसल्यामुळे किराणा येथील अण्वस्त्र साठा जर असेल तर त्याचा खात्मा केला आहे की नाही याची पुष्टी करणे कठीण आहे. सोशल मीडियावरील व्हायरल फुटेजमध्ये आजूबाजूच्या शिखरांवरून धूर येत असल्याचे दिसून येत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp