Manoj Jarange : महायुतीची डोकेदुखी वाढणार, विधानसभेसाठी जरांगेंचा प्लॅन काय?
Maharashtra Assembly Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला (Mahayuti) टफफाईन देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. मात्र ते निवडणूकीच्या मैदानात उतरणार की थेट उमेदवारांना पाडणार? की कुणाला पाठिंबा जाहीर करणार? असे अनेक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे नेमकी काय आहेत? ती या बातमीतून जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जरांगे पाटलांनी विधानसभेसाठी कंबर कसली

निवडणुकीच्या मैदानात उतरणार का?

थेट उमेदवारांना पाडणार?
Maharashtra Assembly Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला (Mahayuti) टफफाईन देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. मात्र ते निवडणूकीच्या मैदानात उतरणार की थेट उमेदवारांना पाडणार? की कुणाला पाठिंबा जाहीर करणार? असे अनेक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे नेमकी काय आहेत? ती या बातमीतून जाणून घेऊयात आणि जरांगेंचा नेमका विधानसभेचा प्लॅन काय आहे? ते वाचूयात. (maharashtra assembly election manoj jarange patil vidhan sabha election strategey mahayuti vs maha vikas aghadi eknath shinde devendra fadnavis udhhav thackeray sharad pawar maratha factor maharashtra politics)
अंतरवाली सराटी नावाचं एक गाव. एक व्यक्ती जो सातत्यानं काही वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठवाड्यात आंदोलन करत असतो. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी अचानक दगडफेक आणि लाठीचार्ज होतो आणि चर्चेत नसणारं हे आंदोलन राज्यभर आणि पुढे चालून देशभर गाजतं आणि मनोज जरांगे पाटील नावाचा व्यक्ती चर्चेत येतो. आधी लोकसभेला जरांगे फॅक्टरचा दणका काही नेत्यांना आणि पक्षांना बसतो आता विधानसभेला देखील हा फॅक्टर अनेकांना धडकी भरवतोय. जरांगे पाटलांचं आता जवळपास ठरलंय. विधानसभेला त्यांची तयारी जोरदार सुरु झालीय. ही तयारी कशी आहे आणि विधानसभेला मराठा फॅक्टर कसा चालणार आणि जरांगेंमुळं कुणाला फायदा आणि कुणाला झटका बसणार याबाबतच पुढील काही मिनिटात आपण जाणून घेऊयात.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, सरकारने घेतला 'हा' निर्णय
लोकसभेला कुणाला पाडायचं हे तुम्ही ठरवा म्हणणारे जरांगे पाटील आता थेट काहींची नावं घेत पाडायचं सांगू लागलेत. फडणवीस, भुजबळ, मुंडे, दरेकर, राणे, लाड, दानवे, वडेट्टीवार, महाजनांसह अनेक नेत्यांना थेट नाव घेत जरांगेंनी अंगावर घेतलंय. लोकसभेला त्यांची जी लाईन होती त्यामध्ये आणि आता विधानसभेच्या आधीची त्यांची लाईन यात बराच फरक जाणवत आहे. मराठा आरक्षणाची त्यांची सुरुवातीची मागणी ते आताची भूमिका यात देखील बराचसा फरक झालाय किंवा त्यांच्या मागण्या वाढत गेल्याचं सुद्धा आपण पाहिलं. आंदोलनाला धार येताच त्यांनी सरकारला अडचणीत आणायला सुरुवात केली. मराठा आरक्षण ओबीसीतून द्या, नंतर सगेसोयरे, त्यानंतर सरसकट अशी मागणी जरांगेंनी केली. यानंतर त्यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांना मदत देण्याची मागणी देखील लावून धरली.
आधी फक्त मराठा आंदोलनाच्या अवतीभवती असणारे जरांगे पाटील हळूहळू इतर मुद्द्यांवरही बोलू लागले. अगदी बांगलादेशच्या अस्थिरतेबाबच्या आंतराष्ट्रीय प्रश्नांवर सुद्धा त्यांची स्टेटमेंट्स येऊ लागली. सध्याचे त्यांची विधाने बघता ते अगदी राजकीय नेत्यांप्रमाणं कुठल्याही मुद्द्यांवर धडाधड बोलताना दिसताहेत. मराठवाड्यात पावसानं हाहाकार केला. यानंतर जरांगे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. तिथं जाऊन त्यांनी आधी धनंजय मुंडेंना फोन करुन सरसकट मदतीचं आश्वासन घेतलं शिवाय सरकारला इशाराही दिला. नंतर त्यांनी रोज ज्यांच्यावर टीका करतात अशा फडणवीसांनाही बोलून घेतलं.