मध्यरात्रीच हादरवून टाकलं... पाकिस्तानच्या 'या' 9 ठिकाणी भारताचा अचूक हल्ला, नेमका कुठे-कुठे केला Air Strike?

मुंबई तक

Operation Sindoor: दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई करत भारताने बुधवारी (7 मे) मध्यरात्री 1.30 वाजता 9 दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. भारताच्या बलाढ्य सैन्याने पाकिस्तानमधील 4 आणि पीओकेमधील 5 ठिकाणांना लक्ष्य केले आहे.

ADVERTISEMENT

पाकिस्तानच्या 'या' 9 ठिकाणी भारताचा अचूक हल्ला
पाकिस्तानच्या 'या' 9 ठिकाणी भारताचा अचूक हल्ला
Google CTA

India Airstrike Pakistan: दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई करत भारताने बुधवारी मध्यरात्री 1.30 वाजता 9 दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor)असे नाव देण्यात आलेलं. हे तिन्ही सैन्यांचे संयुक्त ऑपरेशन होते. भारताच्या बलाढ्य सैन्याने पाकिस्तानमधील 4 आणि पाकव्याप्त काश्मीर (POK)मधील 5 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. भारतीय गुप्तचर संस्था RAW ने सर्व टार्गेट निश्चित केली होती, त्यानंतर संपूर्ण नियोजनाने लष्कर आणि जैशच्या तळांवर हल्ला करण्यात आला. ही ठिकाणे कोणती आहेत आणि ती आंतरराष्ट्रीय सीमेपासून किती अंतरावर आहेत ते आपण पाहूया.

या 9 ठिकाणी भारताचा एअर स्ट्राइक 

1. बहावलपूर - आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेले हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते, जे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले आहे.

2. मुरीदके - हे दहशतवाद्यांचे अड्डे आंतरराष्ट्रीय सीमेपासून 30 किमी अंतरावर आहे. ते लष्कर-ए-तैयबाचे तळ होते जे 26/11 च्या मुंबई हल्ल्याशी जोडलेले होते.

3. गुलपूर- हे दहशतवाद्यांचे अड्डे नियंत्रण रेषेपासून (पूंछ-राजौरी) 35 किमी अंतरावर आहे.