Exclusive Interview: राजीव गांधी ते मनमोहन सिंग… PM मोदी म्हणतात ‘हा’ देशातील सर्वात वाईट काळ!
PM Narendra Modi Exclusive Interview: स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय इतिहासात 30 वर्षांची मिश्र सरकारे हा देशासाठी अंधकाराचा काळ ठरला. असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं आहे. पाहा ते नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

PM Narendra Modi Exclusive Interview India Today: नवी दिल्ली: स्वातंत्र्यानंतर देशाच्या कोणत्या कालखंडाला इतिहासाचा काळा अध्याय म्हणता येईल? सामान्यतः बिगर काँग्रेस नेते आणीबाणीचा काळ हा देशासाठी सर्वात दुर्दैवी काळ मानतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे की, गेली 30 वर्षे (साहजिकच 2014 पूर्वीची 30 वर्षे) ही देशासाठी सर्वात दुर्दैवी होती. इंडिया टुडेचे ग्रुप एडिटर-इन-चीफ आणि अध्यक्ष अरुण पुरी, उपाध्यक्ष कली पुरी आणि समूह संपादकीय संचालक राज चेंगप्पा यांच्याशी खास संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या वर्षांत देशातील जनतेने मिश्र सरकारचा काळ पाहिला आहे. (pm modi exclusive interview rajiv gandhi to manmohan singh why does pm modi consider these 30 years as the worst period of the country)
याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मिश्र (मिली-जुली) सरकारांमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आम्ही 30 वर्षे वाया घालवली. मिश्र सरकारच्या काळात लोकांनी सुशासनाचा अभाव, तुष्टीकरणाचे राजकारण आणि भ्रष्टाचार पाहिला आहे. याचा परिणाम असा झाला की, लोकांची आशा आणि आत्मविश्वास गमावला आणि जगामध्ये भारताची प्रतिमा मलीन झाली. त्यामुळे साहजिकच भाजप ही लोकांची पसंती झाली.’ असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
या काळात देशाच्या शासनप्रणालीत आणि सरकारांमध्ये नेमकं काय घडले ते आपण पाहूया, ज्यामुळे पंतप्रधान मोदींनी या 30 वर्षांचा वारंवार उल्लेख केला आहे.
1984 ते 2014 पर्यंत राजकीय ऱ्हासाचा कालावधी
2014 पूर्वीचा 30 वर्षांचा कालावधी म्हणजे 1984 ते 2014 पर्यंतचा काळ. 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान होण्यापूर्वी मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान म्हणून दुसरा कार्यकाळ संपला. राजीव गांधींच्या काळात देशाची प्रचंड हानी झाली. पंजाब आणि काश्मीरपासून ईशान्येपर्यंत दहशतवाद फोफावला होता. राजीव गांधींनी पंजाब आणि आसामच्या दहशतवाद्यांशी चर्चा केली पण त्यांना यश मिळाली नाही आणि शेवटी त्यांना स्वत:चा जीव एका दहशतवादी हल्ल्यात गमावावा लागला.