MVA : "...तर महाविकास आघाडी तुटली असती", पृथ्वीराज चव्हाणांचे विधान
Prithviraj Chavan: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी झालेल्या घडामोडींबद्दल भाष्य केले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पृथ्वीराज चव्हाण यांचे महाविकास आघाडीबद्दल विधान

लोकसभा जागावाटपावेळी काय घडलं होतं?

काँग्रेसने मविआसाठी कुठे कुठे त्याग केला?
Maha Vikas Aghadi : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी महाविकास आघाडीमध्ये प्रचंड रस्सीखेच झाली होती. सांगली, भिवंडी या लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस विरुद्ध शिवसेना (युबीटी), काँग्रेस विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात बराच काळ चर्चेचे गुऱ्हाळ चालले. आता या काळात महाविकास आघाडीत घडलेल्या घडामोडींबद्दल माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे विधान केले. (Prithviraj Chavan said that had the Congress not compromised, the Mahavikas Aghadi would have broken up)
पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलभिडू या प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केले आहे.
ते म्हणाले की, "एका-एका घटकाने मोदींना हरवले. शेतकरी, बेरोजगार, दलित समाज ज्यांना वाटलं की, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदललं जातंय. त्यांनी हरवले. सगळ्या घटकांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव केला. नरेंद्र मोदींचा पराभव केला."
महाविकास आघाडी तुटली असती -चव्हाण
"आमची काही विशेष रणनीती होती, असे काही म्हणता येणार नाही. आम्ही बराचसा नाजूक... खूप ताणले गेले होते सांगलीच्या बाबतीमध्ये. आम्ही जर कडक भूमिका घेतली असती, तर कदाचित ते (महाविकास आघाडी) तुटले असते", असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.