Pune Accident: आमदार धंगेकरांचा 'तो' खळबळजनक आरोप, पुण्यात नेमकं काय घडणार?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला गंभीर आरोप
आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला गंभीर आरोप
social share
google news

Pune Car Accident: पुणे: पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणानंतर पुण्यातील कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अत्यंत आक्रमकपणे हे प्रकरण लावून धरलं. त्यानंतर प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली. अखेर दोन जणांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या अल्पवयीन मुलाला काल (22 मे) अखेर बाल सुधारगृहात धाडण्यात आलं. मात्र, या सगळ्या प्रकरणाबाबत आता धंगेकरांनी प्रचंड संताप व्यक्त करत पोलीस प्रशासनावर तुफान टीका केली आहे. (pune porsche car accident police commissioner is also involved in the deal mla ravindra dhangekar allegation stirs up)

आमदार रवींद्र धंगेकरांचे गंभीर आरोपानंतर देवेंद्र फडणवीस नेमकी काय कारवाई करणार?

ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी झाली, असा पोलीस कमिश्नर आम्हाला नको.

कल्याणीनगर दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या बिल्डरच्या मुलाला काल कोर्टाने १४ दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळणे हे आपण दिलेल्या लढ्याला मिळालेले पाहिले यश आहे. जर आपण सर्वांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण दाबले गेले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आता खरं या व्यवस्थेतील कचरा साफ करण्याची वेळ आहे. त्याची सुरुवात पोलीस कमिशनर यांच्यापासून करायला हवी. या प्रकरणात इतक्या गंभीर चुका होऊनही कमिशनरने कुणावरही कारवाई केलेली नाही, याचाच अर्थ असा होतो हा गुन्हा दडपण्याच्या "डील"मध्ये कमिशनर देखील सहभागी आहेत, त्यामुळे त्यांचे तातडीने बदली करण्यात यावी. अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना करत आहे. या प्रकरणात पोलीस कमिशनर यांच्यावर संशय निर्माण अश्या काही बाबी यात समोर आल्या आहेत.

1. इतक्या गंभीर प्रकरणात पहिली F.I.R दाखल करताना अक्षम्य अशा चुका करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे कोर्टात आरोपीचा बचाव होऊ शकतो. आरोपी स्वतः सांगतोय मी दारू पिऊन गाडी चालवली तरी देखील कलम १८५ लपवण्यात आले. तसाच प्रकार ३०४ कलममध्ये सुद्धा केला. हे कलम जर अगोदर लावले असते तर परवाच त्याचा जामीन नाकारला असता व व्यवस्थेची इतकी बदनामी झाली नसती.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

2. कुठल्याही अपघातात त्या कारमधील इतर व्यक्तींची चौकशी केली जाते, या प्रकरणात इतर २-३ व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केले आहे. FIR मध्ये त्यांचा साधा उल्लेख देखील नाही. अर्थात यासाठी त्या मुलांचा पालकांकडून वेगळी डील झाली आहे.

3. राज्याच्या गृहमंत्र्यांनी पहिल्या FIR पासून ३०४ कलम होता हे ठासून सांगितले प्रत्यक्षात पहिल्या FIR मध्ये त्याचा उल्लेख देखील नाही, याचाच अर्थ पोलीस कमिश्नर यांनी गृहमंत्र्यांची देखील दिशाभूल केली आहे.

4. आज या घटनेचा ५ वा दिवस आहे. या घटनेच्या तपासात पोलिसांकडून अनेक चुका झाल्या ज्यामुळे पोलीस प्रशासन आणि पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले. सर्व व्यवस्थेची बदनामी झाली परंतु तरी देखील अद्याप कोणीही अधिकारी यात निलंबित नाही. याचा अर्थ तपास अधिकाऱ्यापासून ते कमिश्नरपर्यंत सर्व व्यवस्था विकली गेलेली आहे.

5. काल अचानकपणे पुणे शहरातील ४ ते ५ पब आणि रूफटॉप रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. जर हे सर्व अवैध होतं तर ही घटना घडण्याची वाट का पाहिली..? पोलीस कमिशनर इतक्या दिवस त्यांच्या पाकिटावर मेहरबान होऊन त्यांना पब चालविण्याची मुभा देत होते का..?

त्यामुळे पुणेकरांच्या वतीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना माझी विनंती आहे की, विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेची, पोलीस प्रशासनाची बदनामी होईल असे वर्तन करणाऱ्या पोलीस कमिश्नर यांच्याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रचंड रोष आहे, त्यांची तातडीने बदली करण्यात यावी.

अशा स्वरुपाचे अत्यंत गंभीर असे आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले आहेत. आता या स्वरुपाच्या आरोपानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यातील आयुक्तांवर कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT