Team India : “वर्ल्ड कप जिंकलो असतो, पण पनौतीने…”, PM मोदींबद्दल राहुल गांधी काय बोलले?
भारतीय संघाच्या वर्ल्ड कपमधील पराभवासाठी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवले. टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली असती, पण पनौतीमुळे ते हरले, असं राहुल गांधी म्हणाले.
ADVERTISEMENT

Rahul Gandhi called panauti to pm Narendra Modi : भारताचा विश्व चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव झाला. त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर पनौती हा शब्द ट्रेंड झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला होता. आता याच शब्दाचा उल्लेख करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर शरसंधान साधलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी (२१ नोव्हेंबर) प्रचारासाठी राजस्थानमधील जालौर येथे होते. या प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींनी भारताच्या वर्ल्ड कपमधील पराभवाचाही उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले की, आपल्या मुलांनी वर्ल्ड कप जिंकला असता, पण पनौतीने हरवलं.”
नेमकं काय घडलं?
झालं असं की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करून राहुल गांधी टीका करत होते. त्याचवेळी सभेला आलेल्या काहींनी पनौती… पनौती… पनौती अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर राहुल गांधींनी वर्ल्ड कपमधील भारताच्या पराभवाचा मुद्दा काढला. ते म्हणाले, “आमच्या मुलांनी सहज विश्वचषक जिंकला असता, पण पनौतीने त्यांना हरवले. टीव्हीवाले हे बोलणार नाही. पण जनतेला माहीत आहे.”
हे ही वाचा >> रोहितच्या ‘या’ 2 चुकांमुळे गेला World cup, गोलंदाजीवेळी झाली घोडचूक
पनौती 😉 pic.twitter.com/kVTgt0ZCTs
— Congress (@INCIndia) November 21, 2023