शरद पवारांची ‘ती’ मुलाखत, अजित पवार खरंच नॉट रिचेबल?; पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा

मुंबई तक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (7 एप्रिल) एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन गौतम अदाणी यांची बरीच पाठराखण केली. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. याआधी शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच सावरकरांबाबत केलेलं भाष्य आणि आता अदाणीची पाठराखण यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुन्हा एकदा नॉट […]

ADVERTISEMENT

sharad pawar support to adani ajit pawar really not reachable political earthquake again in maharashtra
sharad pawar support to adani ajit pawar really not reachable political earthquake again in maharashtra
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (7 एप्रिल) एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन गौतम अदाणी यांची बरीच पाठराखण केली. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. याआधी शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच सावरकरांबाबत केलेलं भाष्य आणि आता अदाणीची पाठराखण यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुन्हा एकदा नॉट रिचेबल असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? अशी सध्या कुजबूज सुरू झाली आहे.

काल अजित पवार हे पुण्यात होते. पण अचानक त्यांनी पुण्यातील कार्यक्रम रद्द केले आणि तेव्हापासून ते नॉट रिचेबल असल्याचं समजतं आहे. या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू असताना आता आपच्या माजी नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या एका ट्विटमुळे तर वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे.

अंजली दमानियांचं नेमकं काय ट्विट?

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो ट्वीट करून अंजली दमानिया यांनी ‘किळसवाणं राजकारण मी पुन्हा येईन’ असं कॅप्शन दिलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp