'एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर...' मनसेच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं आजवरचं सगळ्यात मोठं विधान

मुंबई तक

राज ठाकरेंच्या मनसेसोबत शिवसेना (UBT) युती करणार की नाही यावर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आयोजित वर्धापन दिनावेळी बोलताना मोठं विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

मनसेच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं आजवरचं सगळ्यात मोठं विधान
मनसेच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं आजवरचं सगळ्यात मोठं विधान
social share
google news

मुंबई: शिवसेना (UBT)च्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. पण याचशिवाय राज ठाकरेंसोबत युती होणार की नाही यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अत्यंत मोठं वक्तव्य केलं आहे. 

'जे यांच्या मनात आहे आणि जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये.. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठीभेटी घ्यायला लागलेत.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे.

हे ही वाचा>> 'बाबा भरतशेठ +आघोरी विद्या = पालकमंत्री??', अजितदादांच्या नेत्याने Video शेअर करून वेळ साधली?

मात्र, यावेळी उद्धव ठाकरे यांनी हे देखील अधोरेखित केलं की, मनसेसोबतच्या युतीसाठी ते प्रयत्नशील आहेत. पाहा यावेळी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.  

राज ठाकरेंसोबत युती करण्याबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

'ही लढाई केवळ उद्धव ठाकरेंची नाही, शिवसेनेची नाहीए. ही 1960 साली ज्या मराठी माणसाने बलिदान देऊन, रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली. त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आपल्यापासून तोडू देणार नाही. म्हणून जर आपण उभे राहिलो तर ही मुंबई वाचेल.' 

'आहेत आता सगळीकडे बातम्या सुरू आहेत. काय होणार?, कसलं.. नाही होणार का? होणार की नाही होणार कळेल ना.. जे यांच्या मनात आहे आणि जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये.. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठीभेटी घ्यायला लागलेत.'

हे ही वाचा>> 'हे आजच ठेचायला पाहिजे...' हिंदी सक्तीवरून राज ठाकरे संतापले, 'ते' पत्र आलं समोर!

'हॉटेलमध्ये भेटतायेत.. मालकांचे नोकर तुम्ही.. जर यांना मुंबईवर ताबा मिळाला नाही आणि मुंबई पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात आली.. अरे आम्ही घेणारच आहोत.' 

'मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार? अदानीचं कसं होणार? त्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये.यासाठी या मालकाचे, एका शेठजीचे नोकर.. हेच मी म्हणेन.. आणि त्या नोकरांचे नोकर.. जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरा करतायेत ते शेठजींच्या नोकराचे नोकर आहेत.' 

'म्हणून किती प्रयत्न चालले आहेत. होणारच नाही... होणारच नाही.. तुला काय करायचंय? तुला नाही होत.. आमचं आम्ही बघू ना.. आम्ही बघू आमचं काय करायचं ते.. जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की, तुम्ही कोणी शिवसेनाप्रमुखाचा ब्रँड पुसून टाकाल.. तर तुमचं नामोनिशाण  महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. नामोनिशाण पुसून टाकू या भाजपचं आम्ही या महाराष्ट्रातून.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजप आणि शिदेंवर टीका केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp