गरब्यात मुस्लिमांना बंदी : ‘…तर PM मोदींची जास्त पंचाईत होईल’, ठाकरेंचा हल्ला

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

ban on muslim people in garba : Uddhav Thackeray shiv sena slaps to bjp.
ban on muslim people in garba : Uddhav Thackeray shiv sena slaps to bjp.
social share
google news

“गरब्यात मुसलमानांना प्रवेश नाही हे धोरण असेल तर बाटग्यांनी तसा कायदा मंजूर करून घेण्याची हिंमत दाखवावी”, असे आव्हान देत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाजपला लक्ष्य केलं आहे. नरेंद्र मोदी-अमित शाहांसह शिवसेनेने (युबीटी) हल्ला चढवला.

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, “काही बाटगे हे खऱ्या मुसलमानांपेक्षा जोरात बांग देतात. भाजपमध्ये शिरलेल्या नकली हिंदुत्ववाद्यांचेही तसेच आहे. कालपर्यंत जे हिंदुत्वास लाथा घालत होते, ते आता भाजपच्या तंबूत शिरून हिंदुत्वाच्या घंटा जोरात बडवू लागले आहेत. या वेळी गरब्याच्या कार्यक्रमात फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्याची भूमिका भाजपमधील बाटग्यांनी घेतली. गरबा उत्सवात आयोजकांनी आधारकार्ड वगैरे तपासून केवळ हिंदूंनाच प्रवेश मिळावा असे या मंडळींनी जाहीर केले.”

हेही वाचा >> Ajit Pawar यांचा मोठा निर्णय, बँक संचालकपदाचा तडकाफडकी राजीनामा

“मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गरब्याचे आयोजन होते व केंद्रात मोदी-शाहांच्या राजकीय टिपऱ्या घुमायला लागल्यापासून मुंबईतील गरब्यास जरा जास्तच जोर चढला आहे. हिंदुत्वात भेसळ झाली की, मेंदूत बिघाड होतो. कुठेही, कसेही मारून मुटकून हिंदुत्व घुसवायचे असे सध्या चालले आहे. ज्यांना गरबा खेळायचा असेल त्यांनी ‘घर वापसी’ करून हिंदू धर्मात प्रवेश करावा अशी अट हिंदू बाटग्यांनी घातली. भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाच्या बाबतीत जो वैचारिक गोंधळ उडाला आहे, त्याचाच हा नमुना आहे”, असं टीकास्त्र शिवसेनेने (युबीटी) डागलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बाटगे हिंदुत्वाची धार बोथट करताहेत

“आजचा गरबा हा ‘मारू मुलुंड’ किंवा ‘मारू घाटकोपर’ असा वाद करणाऱ्यांचा आहे व अशा गरब्यातच ‘आधारकार्ड’ तपासून प्रवेश देण्याचा खेळ होऊ शकतो. हिंदूंचे प्रत्येक सण आणि उत्सव हे राष्ट्रीय एकात्मतेस महत्त्व देणारे आहेत व ते तसेच असायला हवेत. गरब्याच्या मांडवात आता व्यापारीकरण झाले. तेथे कोट्यवधी रुपयांची उधळण होते, नट-नट्यांचा झगमगाट होतो व ‘मारू घाटकोपर’वाल्यांचे नेते व्यासपीठावर ठाण मांडतात. यात दुर्गापूजेचे मांगल्य कोठे आहे? गरब्यात हिंदूंनाच प्रवेश ही जी टूम काढून बाटगे स्वतःचे ज्ञान पाजळत आहेत ते हिंदुत्वाची व्याख्या व धार बोथट करीत आहेत”, असं शिवसेनेने (युबीटी) म्हटले आहे.

हेही वाचा >> देशातील 5 राज्यात सत्तेचा कौल कोणाला? ओपिनियन पोल नेमकं काय सांगतो?

ठाकरेंच्या शिवसेनेचा मोदींना टोला

“फक्त हिंदूंनाच प्रवेश हेच धोरण राबवायचे म्हटले तर सगळ्यात जास्त पंचाईत पंतप्रधान म्हणून मोदींचीच होईल. चारच दिवसांपूर्वी टांझानिया देशाच्या राष्ट्राध्यक्ष सामिआ सुलुआ हसन भारत भेटीवर आल्या. पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या सन्मानार्थ हैदराबाद हाऊस येथे मेजवानी, संगीत असा जंगी कार्यक्रम ठेवला. सांगायचे इतकेच, मुसलमान कुठेच नकोत हे भाजपचे हिंदुत्ववादी धोरण असेल तर मोदी इस्लामी राष्ट्रांच्या प्रमुखांचे स्वागत आपल्याकडे करणार नाहीत व मोदीही इस्लामी राष्ट्रांत पाय ठेवणार नाहीत. पुन्हा अरब राष्ट्रांतील अनेक राजे व प्रिन्सना पंतप्रधान मोदी मिठ्याच मारतात. मग मुसलमान नकोत धोरणाचे काय करावे? हा जो आंतरराष्ट्रीय गरबा खेळला जातो, त्यात मुसलमान राष्ट्राध्यक्ष येत-जात असतात. बराक ओबामा यांचे आधारकार्ड तपासून पंतप्रधान मोदी त्यांची गळाभेट घेत नव्हते”, असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने मोदींना टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Thane: सासूला जनावरासारखं मारलं, सुनेचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल चीड!

“हिंदू धर्म व संस्कृती इतकी संकुचित कधीच नव्हती. गरब्यात मुसलमानांना प्रवेश नाही हे धोरण असेल तर बाटग्यांनी तसा कायदा मंजूर करून घेण्याची हिंमत दाखवावी. गरब्यात इतर धर्मीयांना प्रवेश दिल्याने ‘लव्ह जिहाद’ सारखे प्रकार वाढतील असा प्रचार करणे म्हणजे हिंदू धर्माला कमी व कमजोर लेखण्यासारखे आहे. मुंबईत सध्या साजरे होणारे ‘व्हायब्रंट गुजरात’ सारखे कार्यक्रम हे ‘लव्ह जिहाद’ इतकेच धोकादायक आहेत.”

ADVERTISEMENT

बाटग्यांचे लव्ह जिहाद…

“हिंदू धर्माचे नवीन ‘कमिशनरी’ हे धर्माच्या नावावर देशात रोज बखेडा निर्माण करीत आहेत. निवडणुका आल्या की, ‘भारत-पाकिस्तान’ किंवा ‘हिंदू-मुसलमान’ असा ‘दांडिया’ खेळायचा ही यांची हातचलाखीच आहे. गरब्यात हिंदूंनाच प्रवेश, मुसलमान नकोत, हे धोरण राबविणाऱ्या बाटग्यांनी लडाखमध्ये ‘चिनी’ नकोत, त्यांना हाकला, अशी भूमिका घेतल्याचे दिसत नाही. कश्मिरातील पंडित आजही तेथे नवरात्र साजरी करण्याच्या स्थितीत नाहीत, पण मुंबईत गरबा कोणी व कसा खेळावा यावर हे बाटगे हिंदुत्ववादी बंधने घालीत आहेत. धर्म सोडून बसलेले लोक धर्माचे रक्षक बनतात तेव्हा धर्म जास्त संकटात येतो. या अशा बाटग्यांमुळेच देश व हिंदुत्वास धोका निर्माण होतो. बाटग्यांचे ‘लव्ह जिहाद’ राष्ट्रीय एकात्मतेस तडे देत आहे”, असं शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT