Varsha Gaikwad : "काँग्रेस नेत्यांनी कठोर भूमिका घ्यायला हवी होती"; गायकवाडांनी सोडलं मौन

विद्या

ADVERTISEMENT

मुंबईत काँग्रेसला दोन जागाच देण्यात आल्या आहेत.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड.
social share
google news

Maharashtra Congress Lok Sabha election 2024 : महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला काही जागांवर तडजोड करावी लागली. यात मुंबईतील काँग्रेसला हव्या असलेल्या जागा ठाकरेंच्या सेनेने घेतल्या. त्यामुळे वर्षा गायकवाड नाराज झाल्या आहेत. अखेर त्यांनी यावर मौन सोडलं. वर्षा गायकवाड यांनी नाना पटोले यांच्याकडे अप्रत्यक्षपणे बोट दर्शवलं आहे.  

मुंबईत वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाराजीच्या मुद्द्यावर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, "मी माझं मत पक्षश्रेष्ठींकडे सांगितलं आहे. बैठकांमध्येही सांगितलं. त्याचबरोबर पत्र लिहूनही कळवलं आहे. मी सातत्याने महाराष्ट्रातील नेते, दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भावना सांगितल्या होत्या." 

त्या पुढे म्हणाल्या की, "माझी हीच अपेक्षा होती की, जागावाटपात आम्हाला आमचे हक्क मिळाले पाहिजेत. भलेही आमचे काही नेते गेले असले, तरी पक्ष संघटना आमची मुंबईमध्ये मजबूत आहे. आम्हाला ही अपेक्षा होती की कमीत कमी तीन किंवा दोन जागा मिळाव्यात. आम्ही बरोबरीत आहोत." 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आम्ही पक्षाचा निर्णय स्वीकारला -वर्षा गायकवाड

"आम्ही आमच्या पक्षाला सांगितलं. आमच्या पक्षाने भूमिका घेतली आहे. पक्षाने एकदा भूमिका घेतल्यानंतर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणं आमची नैतिक जबाबदारी आहे. मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि म्हणून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही स्वीकार केलेला आहे. येणाऱ्या काळात आम्ही कामाला लागू. आमचं काहीही म्हणणं असलं, तर पक्षश्रेष्ठीला कळवू", अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी मांडली.

हेही वाचा >> महाविकास आघाडीला एकही जागा देऊ नका: पंतप्रधान मोदी 

"मुंबईचं वेगळं अस्तित्व आहे. मुंबईच्या बाबतीत चर्चा करत असताना कुठे ना कुठे आम्हाला अपेक्षा होती की, पक्षाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आमची भूमिका अशी की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने काही बाबतीत कठोर भूमिका घ्यायला हवी होती. आपली भूमिका मांडायला पाहिजे होती", असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे नाना पटोले यांच्या नेतृत्वावर निशाणा साधला.  

ADVERTISEMENT

वर्षा गायकवाड म्हणाल्या, "काही गोष्टींचा त्याग करावा लागतो"

"देशाचं संविधान आणि लोकशाही टिकलं पाहिजे. त्यामुळे ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. आम्ही कामाला लागू. प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागू. खूप चर्चा करून ही यादी जाहीर केलेली आहे. आघाडी असताना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात", अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी मांडली.  

ADVERTISEMENT

"मी प्रत्येक बैठकीला उपस्थित होते. आम्ही मुंबईबद्दलची आमची भूमिका सांगितली होती. कोणत्या जागा हव्या आहेत. पहिल्या दिवसांपासून आमची भूमिका बदललेली नाही. सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई किंवा उत्तर पश्चिम मुंबईबद्दलही भूमिका मांडलेली आहे", असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा >> जे प्रकाश आंबेडकरांना जमलं, ते राज ठाकरेंना का नाही?   

"शेवटी आमचं म्हणणं एकच होतं की, निकष काय असला पाहिजे. जिंकणं हाच निकष असला पाहिजे. जिंकण्यासाठी जो उमेदवारी योग्य आहे, त्याला तिथे तिकीट दिलं पाहिजे. हीच आमची सातत्याने भूमिका आहे. शेवटी आम्ही पक्षशिस्त पाळतो. ज्या गोष्टी झाल्यात त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही", असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी प्रचाराला सुरूवात करणार आहोत असे सांगितले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT