लोकसभा निवडणुकीत कोणाला मिळणार संधी? भाजपची पहिली यादी येणार कोणत्याही क्षणी

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका (Lok Sabha) जवळ आल्या आहेत. भाजप लवकरच आपल्या उमेदवारांची नावे निश्चित करणार आहे. प्रत्येकजण पहिल्या यादीची वाट पाहत आहे. गुरुवारी (29 फेब्रुवारी) भाजप हायकमांडमध्ये बैठका सुरू होत्या. विविध राज्यातील नेत्यांशी चर्चा करून प्रत्येक जागेवर चर्चा झाली. पहिली बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोन तास चालली. सायंकाळी 7 नंतर ही बैठक सुरू झाली. त्यानंतर भाजप मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत तब्बल ४ तास मॅरेथॉन विचारमंथन झाले. भाजपच्या मुख्यालयात रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत जागांवर चर्चा सुरू होती. (Who will get a chance in the Lok Sabha elections bjp to decide candidate 6 hours marathon meeting in Central Election Committee meeting)

या दोन्ही बैठकीत पहिली यादी अंतिम करण्यासाठी चर्चा झाली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कमान आपल्या हातात घेतली आहे. गुरुवारी (29 फेब्रुवारी) संध्याकाळी 7 वाजता त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी बराचवेळ बैठक घेतली. त्यानंतर ते भाजप मुख्यालयात पोहोचले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भूपेंद्र यादव आणि राज्यांचे नेते येथे उपस्थित होते. या निवडणुकीत पक्ष काही जुन्या नेत्यांची तिकिटं कापतो की उमेदवार निवडीत काही नवीन प्रयोग करतो, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

lok sabha election

कमकुवत जागांसाठीचे उमेदवार सर्वात आधी होणार घोषीत?

आगामी लोकसभा निवडणुका एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपला उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील 'कमकुवत जागांवर' उमेदवारांची घोषणा करायची आहे. 2019 च्या निवडणुकीत ज्या जागांवर भाजपचा पराभव झाला त्या ठिकाणी संघटना मजबूत करण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्र्यांचे पथकही मैदानावर पाठवण्यात आले होते. या जागांवर विजयाची शक्यता वाढल्याचे पक्षाला वाटते. त्यामुळेच ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

उत्तरप्रदेशवर भाजपचे विशेष लक्ष

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक उत्तर प्रदेशातील सर्व 80 जागांवर चर्चा करण्यासाठी उपस्थित होते. भाजपच्या निवडणूक समितीच्या बैठकीत पश्चिम उत्तरप्रदेशातील जागा आणि गणना यावरही लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. येथील सर्व जागांवर चर्चा झाली.

ADVERTISEMENT

गेल्या आठवड्यात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी 'कमकुवत जागांवर' चर्चा करण्यासाठी बैठक घेतली होती. या ओळखल्या गेलेल्या जागांवर भाजपला कडवे आव्हान उभे राहू शकते, असा विश्वास आहे.

ADVERTISEMENT

भाजप आसाममध्ये 11 जागांवर निवडणूक लढवणार

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत आसाममधील जागावाटपाच्या सूत्रावरही चर्चा झाली. आसाममध्ये एकूण 14 जागा आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप आपल्या मित्रपक्षांना 3 जागा देणार आहे. आसाम गण परिषदेला 2 जागा आणि APPL ला 1 जागा मिळेल. उर्वरित 11 जागांवर भाजपचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

पुढील बैठकीत होणार काश्मीरवर चर्चा!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आसामचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. जम्मू, झारखंडसह इतर राज्यातील प्रमुख नेतेही उपस्थित होते. पुढील बैठकीत काश्मीरवर चर्चा होणारह आहे.

भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधानही लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याची का होतेय चर्चा?

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनीही या बैठकीला हजेरी लावली. जेव्हा  राज्याचे नेते केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये सहभागी होतात त्यांच्या संबंधित राज्यातील उमेदवारांची चर्चा केली जाते. यामुळेच भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान आणि मनसुख मांडविया यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्रीही लोकसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाने या सर्व नेत्यांची पुनरावृत्ती केलेली नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT