Rahul Gandhi : 5 कारणे ज्यामुळे राहुल गांधींनी वायनाडऐवजी रायबरेली निवडली

भागवत हिरेकर

Rahul Gandhi : 2019 मध्ये गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये राहुल गांधी भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले, तेव्हा वायनाडने त्यांना खासदार म्हणून निवडून दिले होते.

ADVERTISEMENT

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राहुल गांधी रायबरेलीचेच खासदार राहणार

point

प्रियांका गांधी वायनाडमधून लढणार निवडणूक

Rahul Gandhi Raebareli : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली. यात एक होता वायनाड आणि दुसरा रायबरेली. दोन्ही मतदारसंघातून ते विजयी झाले. त्यामुळे कोणत्या मतदारसंघाची खासदारकी ठेवणार, याबद्दल उत्सुकता होती, ती संपली. राहुल गांधींनी वायनाडची खासदारकी सोडली. तिथे आता पोटनिवडणूक होणार असून, काँग्रेसकडून प्रियांका गांधी निवडणूक लढवणार आहेत. पण, राहुल गांधींनी वायनाड ऐवजी रायबरेलीची निवड का केली? काँग्रेसचे राजकारण काय, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. (why did Rahul Gandhi retains Rae Bareli Lok Sabha seat)

2019 मध्ये गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये राहुल गांधी भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले, तेव्हा वायनाडने त्यांना खासदार म्हणून निवडून दिले होते. कठीण काळात साथ देणाऱ्या वायनाड मतदारसंघ सोडून राहुल गांधींनी रायबरेली का निवडले? 

खरंतर या निर्णयामागे काँग्रेसची रणनीती असल्याचे दिसून येत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी उत्साहित होऊन काँग्रेस आक्रमक भूमिका घेत आहे. लेखक आणि राजकीय विश्लेषक रशीद किडवाई यांनी आज तकला सांगितले की, 'काँग्रेसचा हा निर्णय एक मजबूत आणि विचारपूर्वक दिलेला राजकीय संदेश आहे'

हेही वाचा >> काँग्रेसचं वादाच्या मुद्द्यावर 'बोट', उद्धव ठाकरे धडा घेणार का?

किडवाई यांच्या मते, '२०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी काँग्रेसला लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. नरेंद्र मोदी 2014 आणि 2019 च्या तुलनेत राजकीयदृष्ट्या कमकुवत स्थितीत आहेत, कारण यावेळी केंद्रात एनडीएचे सरकार आहे आणि भाजपला पूर्ण बहुमत नाही. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनाही संसदेत ठेवून विरोधातील नेतृत्वाला धार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.'

हे वाचलं का?

    follow whatsapp