Maharashtra Political Crisis : ठाकरे-शिंदेंच्या लढाईचा उद्या ‘सुप्रीम’ फैसला!
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ 11 मे रोजी निकाल देणार आहे.
ADVERTISEMENT

Surpeme court judgement on Maharashtra political crisis : ज्या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाकडे लागलं आहे, त्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालाची तारीख अखेर ठरली! सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ 11 मे रोजी या प्रकरणावर निकाल देणार आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेल्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कायदेशीर लढाईत कुणाचा जय होणार, यामुळे उत्सुकता वाढली आहे. (Supreme Court Constitution Bench to deliver the judgment in ShivSena case tomorrow, says CJI DY Chandrachud)
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्याचबरोबर धनुष्यबाण आणि शिवसेना नावही ठाकरेंना गमवावं लागलं.
शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात सुरू झालेला राजकीय सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात गेला. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रमुख मुद्द्यासह इतर मुद्द्यांवरील याचिकांच हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने पाच सदस्यी घटनापीठाकडे पाठवलं. त्यानंतर या प्रकरणावर सुर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सलग सुनावणी झाली.
वकिलांची तगडी फौज, कायद्याचा पडला किस
उद्ध ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केलेला आहे. तर एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे, एन. के. कौल, महेश जेठमलानी आणि सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वतीने युक्तीवाद केला. तर मनिंदर सिंग यांनी विधानसभा अध्यक्षांच्या वतीने युक्तिवाद केला.










