मोदी, शाह, फडणवीस; उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात फुंकले रणशिंग, शिवसैनिकांना काय दिला मेसेज?
कितीही शहा आणि अफजलखान येऊ द्यात, तुम्ही सोबत आहात मला चिंता नाही, असा विश्वास आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळीत आयोजित राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर व्यक्त केला.
ADVERTISEMENT

Maharashtra Political News : कितीही शहा आणि अफजलखान येऊ द्यात, तुम्ही सोबत आहात मला चिंता नाही, असा विश्वास आज शिवसेना ”उद्धव बाळासाहेब ठाकरे” गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. वरळीत आयोजित राज्यव्यापी पदाधिकारी शिबीरात ते बोलत होते. तसेच मणिपूरला जाऊन या. मोदी अमेरिकेत जातायत मग मणिपूरला का जात नाही. मोदींनी जाऊन दाखवावे मणिपूरला, असे थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. यासह अनेक मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात काय काय मुद्दे मांडलेत ? हे जाणून घेऊयात. (uddhav thackeray criticize devendra fadnavis pm narendra modi amit shah on thackeray group statewide meeting worli)
हल्ली बरेचदा असं होतं तुमचा उत्साह बघितला की भारावल्यासारखे होते. शिवसेनाप्रमुखांनी तुमच्या सारखे लढवय्ये मला दिले, हे माझे किती जन्माचे भाग्य आहे, जिवाला जीव देणारे सोबती मला लाभले. कागदावर माझ्याकडे काहीच नाही, ना चिन्ह, ना नाव. तुम्ही रक्ताची पाणी केले ते लाचार ”मिंधे” पलिकडे गेले तरी देखील तुम्ही सोबत आहात. तुमची साथ महत्वाची. उद्या आपला वर्धापनदिन आणि परवा जागतिक गद्दार दिन. मराठी, अमराठी, मुस्लमान, ख्रिश्चन आहेत.
‘हेच ते ठिकाण इथे कोविड सेंटर”, ”लोक म्हणतात जे गेले त्यांना जाऊ द्या”, ”सुखात सोबत असणारे रिश्ते आणि दुखात सोबत असतात ते फरिश्ते”. ”कितीही शहा आणि अफजलखान येऊ द्यात तुम्ही सोबत आहात मला चिंता नाही”. आपल्या घरात येऊन फोडाफोडी करताहेत. सत्तेची मस्ती आहे तुमचा फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही. जा मणिपूर मध्ये जाऊ या. अमित शहांनी जाऊन काय केले? मोदी अमेरिकेत जातायत मग मणिपूरला का जात नाही. युक्रेन युध्द थांबवले ही भाकड कथा. मोदींनी जाऊन दाखवावे मणिपूरला. मुद्दाम अयोध्येला व्यासपीठावर बोलावले. यापुढे माता भगिनीवर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवू नका. आणीबाणीचा काळ मला आठवतो. जनता पक्षाचा काळ मला आठवतो. शिवसेनाप्रमुख म्हणाले मला आठ दहा असलेले असतील तरी मला चालतील. युध्द निष्ठेवर लढल्या जाते. पानिपतच्या युद्धाचा संदर्भ. तिथे पण कुणी शहा होता. मराठ्यामध्ये फुट पाडा ही आजची निती नाही. तुमच्या डोळ्यादेखत लुट सुरु आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु होती आता हे मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही ते होऊ देणार नाही.
मी २३ तारखेला पाटण्याला जातोय. पूर्वी भाजपचे लोक यायचे आता भाजप सोडून सगळे येताहेत. भाजपेत्तर एकत्र येणार आहे ती देशप्रेमींची एकजूट होणार आहे. काल परवा फडणवीसांनी प्रश्न विचारला पूर्वी एक जाहीरात यायची सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. सावरकरांनी हालपेष्टा मोदी शहा फडणवीसांसाठी भोगल्या नव्हत्या. आमचा एकच बाप तुमचे किती? तुम्ही सावरकर प्रेमी असाल तर देश बुडाखाली घेणाऱ्या तुमच्या नेत्याचा करा.