India Alliance: ‘…तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच’, प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर तोफ डागली
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर अस्पृश्यतेचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी एकाच वेळी राजकीय पक्षावर टीका करत त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली आहे.
ADVERTISEMENT

Prakash Ambedkar : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात देशातील विरोधी गटातील पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. देशातील अनेक नेते या आघाडीत सामील आहेत. त्यामधीलच काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (National Congress Party) हे दोन पक्षही त्यामध्ये सहभागी आहेत. मुंबईतील बैठकीनंतर इंडिया आघाडीची जोरदार चर्चा सुरु झाली. त्या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अस्पश्यतेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गंभीर आरोप केले आहे. त्याबाबतचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. या दोन्ही पक्षावर त्यांनी आरोप करताना अस्पश्यतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण आता आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.
आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य…
प्रकाश आंबेडकर यांनी एकाच वेळी इंडिया आघाडीवर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी अस्पृश्यतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जाते अशा शब्दात त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा समाचार घेतला आहे. अस्पृश्यता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मानली जात असल्याचा गंभीर आरोपही या दोन्ही पक्षावर केला आहे.
हे ही वाचा >> Uddhav Thackeray : चिमुकल्याने दिली उद्धव ठाकरेंना शिदोरी, म्हणाले माझ्याकडे शब्द नाहीत
सनातन धर्म मानणारे
प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीची बैठकीवर जोरदार टीका करत त्यांनी राज्यातील विरोधी गटात असणाऱ्या पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यात आणि देशात भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीचे सरकार आले. त्यानंतर त्यांचे प्रचारक म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच काम करतात असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.