गावकडल्या आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कधी राहायला मिळणार?: संजय राऊत

मुंबई तक

मुंबई: राज्यातील विधानपरिषद निवडणूक ही प्रचंड चुरशीची झाली आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. यामुळे आता सर्वच पक्षाने आपल्या आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलं आहे. पण याच गोष्टीचं समर्थन करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी असं म्हटलं आहे की, ‘गावकडच्या आमदारांना इथं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कधी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्यातील विधानपरिषद निवडणूक ही प्रचंड चुरशीची झाली आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. यामुळे आता सर्वच पक्षाने आपल्या आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलं आहे. पण याच गोष्टीचं समर्थन करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी असं म्हटलं आहे की, ‘गावकडच्या आमदारांना इथं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कधी राहायला मिळणार, ही एक व्यवस्था असते.’

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात ठेवलं आहे. यावेळी या आमदारांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. याच गोष्टीवरुन आता सर्वच पक्षांवर टीका केली जात आहे. पण याबाबत संजय राऊत यांनी आपली बाजू मांडतांना समर्थन केलं आहे.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

‘महाराष्ट्र हे खूप मोठं राज्य आहे, चांद्यापासून-बांद्यापर्यंत, प्रवासाच्या सुविधा आणि अनेक अडचणी यांतून त्यांना एकत्र मतदान करता यावं, त्यांना मार्गदर्शन करता यावं. मतदान कशारितीने करावं, काय करावं यासाठी त्यांना एकत्र बोलावलं जातं. तसंच गावकडल्या आमदारांना इथं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कधी राहायला मिळणार? खरं तर ही एक व्यवस्था आहे.’ असं म्हणत संजय राऊत यांनी हॉटेल्स पॉलिटिक्सचं समर्थन केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp