भारतीय गोलंदाजांचा जलवा; न्यूझीलंडच्या संघाचा 108 धावातच केला खुर्दा
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शनिवारी वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आणि हा निर्णय योग्य ठरला. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी कमाल केली आणि मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी न्यूझीलंडवर हल्ला चढवला. परिस्थिती इतकी बिकट होती की न्यूझीलंड संघाने अवघ्या 15 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटच्या […]
ADVERTISEMENT

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शनिवारी वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आणि हा निर्णय योग्य ठरला. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी कमाल केली आणि मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी न्यूझीलंडवर हल्ला चढवला.
परिस्थिती इतकी बिकट होती की न्यूझीलंड संघाने अवघ्या 15 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडची ही सर्वात वाईट कामगिरी होती, जिथे त्यांनी त्यांचा निम्मा संघ इतक्या कमी धावसंख्येसाठी गमावला. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ अवघ्या 108 धावांवर सर्वबाद झाला.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचे पहिले 5 विकेट
• पहिली विकेट – फिन ऍलन, 1-0 0.5 षटके
• दुसरी विकेट – हेन्री निकोल्स, 2-8 5.3 षटके