मराठी क्रीडा पत्रकारितेचा जनक हरपला! वि.वि. करमरकर यांचे निधन
v v karmarkar Death News : मुंबई । मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि क्रीडा पानाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय क्रीडा समालोचक वि.वि. करमरकर यांचं सोमवारी (6 मार्च) सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. अंधेरी पूर्व […]
ADVERTISEMENT

v v karmarkar Death News : मुंबई । मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि क्रीडा पानाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय क्रीडा समालोचक वि.वि. करमरकर यांचं सोमवारी (6 मार्च) सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Marathi Sports Senior journalist v.v karmarkar passes away)
1960 च्या आधी मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान नव्हते. ते करमरकर यांनी मिळवून दिले. यासाठी एक पूर्ण पान तयार करून खेळांची आवड असणाऱ्या वाचकांची भूक त्यामधून त्यांनी पूर्ण केली. १९६२ मध्ये महाराष्ट्र टाइम्स सुरू झाल्यानंतर या दैनिकाच्या पहिल्या टीममध्ये करमरकर यांचा सहभाग होता. द्वा.भ.कर्णिक संपादक असलेल्या या दैनिकात सुरुवातीला आधी दोन कॉलममध्ये क्रीडा जगताच्या बातम्या येत असत. करमरकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कालांतराने संपूर्ण पान खेळांच्या पानाला मिळाले. संपूर्ण मराठी दैनिकांच्या जगतात हा प्रयोग पहिल्यांदा झाला आणि वाचकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यामुळे नंतर राज्यात इतर दैनिकांनी सुद्धा एक पूर्ण पान खेळांच्या बातम्यांना देण्याचा निर्णय घेतला. यामुळे खेळांची आवड असणाऱ्या पत्रकारांना यामुळे पूर्ण वेळ नोकऱ्या उपलब्ध झाल्या. परिणामी खेळ, खेळाडू, संस्था, क्रीडा संघटक आणि कार्यकर्ते यांच्या सततच्या प्रयत्नांची धडपड ठळकपणे लोकांसमोर आली. या सर्वांचे निर्माते करमरकर असल्याने ते क्रीडा पानाचे जनक म्हणून ओळखले गेले. विशेष म्हणजे मटाचे क्रीडा पान त्यांनी इतके लोकप्रिय केले की पहिल्या पानावर एक नजर टाकली की वाचक थेट मागच्या खेळांच्या पानावर जात. आपली आवड पूर्ण झाली की मग आतल्या पानावर नजर टाकत. राज्यभरातल्या वाचकांच्या सर्व्हेमधून ही बाब ठळकपणे समोर आली होती.
नाना पटोलेंच्या भावावर काँग्रेस नेत्याच्या अपहरणाचा आरोप, काय आहे प्रकरण?