Appasaheb Dharmadhikari: ‘त्या’ दुर्घटनेतून घेतला धडा, समर्थ बैठकीबाबत मोठा निर्णय
Shree Samarth Baithak: आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने 14 श्री सदस्यांना प्राण गमवावे लागले होते. ज्यानंतर आता धर्माधिकारींकडून बैठकींच्या वेळेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

Shree Samarth Baithak: मुंबई: ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना 16 एप्रिल 2023 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) हा राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. जिथे 20 लाखांहून अधिक श्री सदस्य हे जमा झाले होते. ज्यापैकी 14 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजनावर टीका केली गेली होती. यानंतर संपूर्ण बैठक आणि धर्माधिकारी कुटुंबीयांबाबत चर्चा सुरू झाली होती. अनेकांनी बैठक परिवारावर देखील टीका केली होती. मात्र, आता याच चुकीमधून धर्माधिकारी प्रतिष्ठानने धडा घेतला आहे. तसंच बैठकीबाबत एक मोठा निर्णय देखील घेतला आहे. (after tragedy in maharashtra bhushan ceremony appasaheb dharmadhikari took big decision time of samarth baithak changed)
श्री समर्थ बैठकीला मोठ्या प्रमाणात श्री सदस्य हे जातात. आठवड्यात एक दिवस बैठक होते. जी साधारण अडीच तास असते. पुरूषांची बैठक ही साधारण संध्याकाळी 7.30 नंतर भरते. मात्र, महिलांची बैठक ही सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भरवली जाते. अनेक ठिकाणी बैठक ही सकाळी 10.30 आणि दुपारी 1.30 वाजता असते. पण आता याचबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्रात पारा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास हा अनेकांना जाणवू शकतो. अशावेळी आधीच एका कार्यक्रमात उष्माघाताने झालेल्या अप्रिय घटनेची जाणीव ठेवून बैठकीची वेळ ही पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार, महिलांच्या दुपारच्या बैठका या रद्द करण्यात आल्या असून आता फक्त सकाळी 7.50 ते 10 वाजेपर्यंतच या बैठका असणार आहेत.