Manoj Jarange : CM शिंदे म्हणाले, ‘सरसकट नाही’, जरांगेंनी गोंधळ केला दूर
मराठा आरक्षण मुद्द्यावर सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे पाटलांनी मागे घेतलं. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानाने गोंधळ निर्माण झाला आहे. त्यावर आता मनोज जरांगेंनी भूमिका मांडली.
ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil Eknath shinde Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांनी उपोषण थांबवलं, पण त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका विधानाने गोंधळ निर्माण झाला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र दिली जाणार नाही, असं शिंदेंनी म्हटलं. यामुळे संभ्रम निर्माण झाला. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी नेमकी मागणी काय, याबद्दल भूमिका स्पष्ट करत गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला.
मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत उपोषण थांबवलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन आभार मानले. या पत्रकार परिषदेत ‘मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र किंवा सरसकट आरक्षण द्यावं ही जरांगे-पाटील यांची प्रमुख मागणी आहे’, असा प्रश्न शिंदेंना करण्यात आला.
शिंदेंच्या कोणत्या विधानामुळे निर्माण झाला संभ्रम?
या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, “नाही… तुम्ही आता असं भरकटवू नका. कारण त्यांनी जे सांगितलं ते हे की ज्यांच्या नोंदी आहेत कुणबी, त्यांना तुम्ही तात्काळ युद्ध पातळीवर दाखले देण्याचं काम करा आणि याबाबतीत प्रत्येत जिल्ह्यात 10-10 लोक अधिकचे द्या आणि हे काम युद्धपातळीवर पूर्ण करा.. तशा प्रकारचं आश्वासन आमच्या लोकांनी दिलं आहे.”
हे ही वाचा >> Maratha Reservation : “मोदींच्या खिशात आरक्षणाची चावी, जरांगेंनी…”, ठाकरेंचे दहा सवाल
मनोज जरांगे पाटील काय बोलले?
मुख्यमंत्र्यांच्या विधानावर जरांगे पाटील म्हणाले, “सरसकट आरक्षण द्यायचं अशीच चर्चा झालीये. किंवा सरसकटच्या जागेवर मागेल त्याला आरक्षण द्यायचं. तो एकच विषय आहे.”










