Maharashtra Bhushan : अखेर ओळख पटली, मृत्यू झालेले 13 श्री सदस्य कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

13 people have died due to heat stroke during Maharashtra Bhushan award ceremony, see deceased list
13 people have died due to heat stroke during Maharashtra Bhushan award ceremony, see deceased list
social share
google news

नवी मुंबईतील खारघर येथे 16 एप्रिल रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील उपस्थितांपैकी 13 जणांच्या मृत्यूने संपूर्ण कार्यक्रमालाच गालबोट लागलं आहे. भरदुपारी झालेल्या या कार्यक्रमामुळे 13 जणांना उन्हाचा फटका बसला आणि जीव गमावावा लागल्याने राजकारणही तापलं आहे. मृत्यू झालेल्या काही श्री सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता उर्वरित मृत श्री सदस्यांची ओळख पटली असून, त्यांनी नावे प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 16 एप्रिल रोजी प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा गौरव करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमानंतर झालेल्या मृत्यूकांडाने खळबळ उडाली.

हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?

रखरखत्या आणि अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हात कार्यक्रम घेण्यात आला आणि 13 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. काही जणांचा 16 एप्रिल रोजीच मृत्यू झाला, तर काही जणांचा 17 एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची ओळख आता पटली असून, प्रशासनाने सर्वांची नावे जाहीर केली आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मृत्यू झालेल्या 13 श्री सदस्यांमध्ये 9 महिला व 4 पुरुष आहेत. तर 12 व्यक्ती रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. 35 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Maharashtra Bhushan Event : मृत्यू झालेल्यांची नावे अशी

1) तुळशिराम भाऊ वागड
2) जयश्री जगन्नाथ पाटील
3) महेश नारायण गायकर
4) कलावती सिद्धराम वायचाळ
5) मंजूषा कृष्णा भोंबडे
6) भीमा कृष्णा साळवी
7) सविता संजय पवार
8) स्वप्नील सदाशिव केणी
9) पुष्पा मदन गायकर
10) वंदना जगन्नाथ पाटील
11) मिनाक्षी मोहन मेस्त्री
12) गुलाब बबन पाटील
13) विनायक हळदणकर

ADVERTISEMENT

13 मृत्यूवरून राजकीय ‘वार’, अप्पासाहेब धर्माधिकारींनी म्हटलं?

या मृत्यूवरून राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी निवेदन प्रसिद्ध केलं. “महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सारे श्री सदस्य माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे.या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झालाा आणि त्यातील काहींचा दुदैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित झालो आहे”, असं त्यांनी म्हटलेलं आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Appasaheb Dharmadhikari : पुरस्कार 25 लाखांचा, अन् खर्च 14 कोटींचा; शिंदे सरकारचा अजब कारभार

“श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्नतीत लाभो,तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुदैवीच होता. या घटनेचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे,” असं त्यांनी निवेदनाच्या शेवटी म्हटलेलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT