Manoj Jarange : ‘जरांगेला अटक करा, मुसक्या…’, सदावर्ते फडणवीसांचं नाव घेऊन काय बोलले?

भागवत हिरेकर

gunaratna sadavarte latest news : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरु केल्यानंतर सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी सदावर्तेंनी फडणवीसांकडे केली आहे.

ADVERTISEMENT

Gunaratna Sadavarte Latest news : sadavarte demand to arrest to manoj jarange patil after vandalize cars
Gunaratna Sadavarte Latest news : sadavarte demand to arrest to manoj jarange patil after vandalize cars
social share
google news

Gunaratna Sadavarte latest news : “एकट्या जरांगेचं ऐकायचं नाही. सरकारने जरांगेचे लाड थांबवावेत, नाहीतर मी प्राणांतिक उपोषण करेन”, असा इशारा देत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी केली. काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केल्यानंतर सदावर्तेंनी यांचा ठपका मनोज जरांगे पाटलांवर ठेवला. (Gunaratna Sadavarte has demanded to Home minister of Maharashtra Devendra Fadnavis that Manoj Jarange, who do hunger strike for Maratha reservation should be arrested.)

गुणरत्न सदावर्ते यांनी गाड्यांची तोडफोड केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ला चढवला. “मला हल्लेखोरांना आणि मनोज जरांगेंना प्रश्न विचारायचा आहे की, हीच आहे का तुमच्या शांतता आंदोलनाची व्याख्या? मला शांत केलं जाऊ शकत नाही.”

हे ही वाचा >> Manoj Jarange : “आम्हाला नाटक…”, सदावर्तेंच्या गाड्या फोडल्यानंतर जरांगे संतापले

“मी भारताचा पिल्लर असतं ५० टक्के जागांचं, ज्या खुल्या वर्गासाठी जागा असतात. त्या जागातून वाचवण्यासाठीचा माझा लढा आहे. या देशाला जाती-जातीत न तोलता गुणवत्तेत भर पडावा, यासाठी माझा लढा आहे. माझ्या कष्टाची आणि घामाची नुकसान तुम्ही केलं. यापूर्वी ३२ पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना नाहक मारहाण केली. पोलीस अधिकाऱ्यांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली”, असा दावा सदावर्तेंनी यावेळी केला.

मुलगी आणि पत्नीला धमक्या

“मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या. माझी मुलगी झेन गेल्या आठ दिवसांपासून शाळेत जात नाहीये. झेनला मारण्याच्या आणि जयश्री पाटलांना उचलून नेण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. अशा प्रकारचे हल्ले होतील, आघात होईल. ५० टक्के जागा वाचवण्यासाठी आम्हाला त्रास दिला जाईल, असे कॉल, ऑडिओ रेकॉर्डिंग होत्या”, असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp