ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं निधन! कोल्हापूर ते केंब्रिज प्रवास... कशी होती संपूर्ण कारकीर्द?

मुंबई तक

Jayant Narlikar: जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूरमध्ये झाला होता. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रख्यात गणितज्ञ आणि बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक होते.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जयंत नारळीकर यांचं आज पहाटे निधन

point

वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jayant Naralikar Passed Away : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत विष्णू नारळीकर यांचं आज पहाटे निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयंत नारळीकर हे भारतातील प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक आणि विज्ञान कथाकार आहेत. त्यांना खगोल शास्त्र क्षेत्रातील अग्रगण्य संशोधकांपैकी एक मानलं जातं. त्यांनी विश्वाच्या उत्पत्ती, गुरुत्वाकर्षण आणि काळ-प्रकाशाच्या परस्परसंबंधांवर महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे.

केंब्रिज विद्यापीठातून खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीमध्ये PHD

जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूरमध्ये झाला होता. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रख्यात गणितज्ञ आणि बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक होते. तर त्यांची आई सुमती नारळीकर संस्कृत विद्वान होत्या. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच शैक्षणिक आणि बौद्धिक वातावरण मिळाले.

हे ही वाचा >> छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ, कुणाला बसणार धक्का? राजकीय घडामोडींचा अर्थ काय?

जयंत नारळीकर यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून गणित विषयात बी.एस्सी. आणि एम.एस्सी. पूर्ण केलं. त्यानंतर, त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीमध्ये पीएच.डी. मिळवली. त्यांचे पीएच.डी. मार्गदर्शक प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल होते.

हॉयल-नारळीकर सिद्धांत...

जयंत नारळीकर यांनी फ्रेड हॉयल यांच्यासोबत मिळून "हॉयल-नारळीकर सिद्धांत" विकसित केला. विश्वाच्या उत्पत्ती आणि गुरुत्वाकर्षण यांच्याशी संबंधित हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत स्थिर अवस्था विश्वरचनेच्या (Steady State Cosmology) आधारावर आहे. जयंत नारळीकर यांनी खगोलभौतिकी, गुरुत्वाकर्षण, आणि विश्वरचनाशास्त्र यांवर महत्त्वपूर्ण संशोधन केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp