Chhagan Bhujbal : 'भानगडी करून काय फायदा?', भुजबळांचा जरांगेंना खोचक सवाल
Chhagan Bhujbal Manoj Jarange Patil : मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.
ADVERTISEMENT
Chhagan Bhujbal Manoj Jarange : सात मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. त्यांची प्रकृती ढासळू लागली आहे. दरम्यान, त्यांच्या उपोषणाबद्दल वेगळीच शंका कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, "जर सगळं झालं, तर परत उपोषण करायचं कारण काय? मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे. पाठीमागच्या दाराने त्यांना कुणबी म्हणून घुसवू नका. सगेसोयरेची व्याप्ती वाढवू नका. याच्यासाठी आमची लढाई सुरू आहे."
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारलं -भुजबळ
मराठा आरक्षण मुद्द्यावर भुजबळ म्हणाले की,"वेगळं आरक्षण द्यायला विरोध नाही. उलट द्या असंच आमचं म्हणणं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचं राज्य असताना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एक कायदा केला... म्हणजे राणे समिती, पण तो फेटाळला गेला. फडणवीस मुख्यमंत्री असताना गायकवाड कमिशन उच्च न्यायालयात टिकला, पण सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं. त्यातील त्रुटी कमी करण्यासाठी सुक्रे आयोग त्यांनी नेमला. आयोग कसा वादग्रस्त झाला, ते वेगळं. जुन्या लोकांनी राजीनामे दिले आणि यांनी नवीन लोक नेमले", असे त्यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
जरांगेंच्या उपोषणाबद्दल भुजबळ काय बोलले?
"क्युरेटिव्ह पिटिशनसाठी तीन न्यायमूर्ती बसलेले आहेत. सुक्रे आयोग आणि न्यायमूर्ती हे मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल आणि ते कसं टिकेल. याला आमचा पाठिंबा आहेच. ते 15 तारखेला येईल असं वाटलं होतं", असं सांगत असताना भुजबळांनी जरांगेंच्या उपोषणावर भाष्य केलं. "कदाचित जरांगेंना वाटलं असेल, 15 तारखेला येणारच आहे आणि मराठा आरक्षण मिळणारच त्यामुळे आपण 10 तारखेलाच उपोषणाला बसावं. म्हणजे मग श्रेय सुद्धा मिळू शकतं. त्यांची समज काही चुकीची नाहीये", अशी भूमिका भुजबळांनी मांडली.
"10 तारखेला उपोषणाला बसलो. 15 तारखेला आरक्षण मिळालं की, परत दुसरा गुलाल आपल्याला उधळता येईल. पण, ते काम पूर्ण झालेलं नाही. ते पाच-सहा दिवस पुढे गेलेलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या तब्येतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ते आता शिव्याच द्यायला लागलेत", असे म्हणत भुजबळांनी जरांगेंना उत्तर दिलं.
ADVERTISEMENT
शिव्यांच्या मुद्द्यावर भुजबळ पुढे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि मला आईवरून शिव्या देत आहेत. गल्लीत शिव्या देतात ना, तशा शिव्या. त्या चॅनेल्सनी दाखवल्या. तिथे असलेल्या विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी या सगळ्यांना तुम्ही भाडखाऊ आहात, असं सुद्धा ते (मनोज जरांगे) त्यांना (अधिकाऱ्यांना) म्हणाले. तर असा त्रागा करून घेण्यापेक्षा शांत बसावं", असा सल्ला भुजबळांनी जरांगेंना दिला.
ADVERTISEMENT
"मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा आम्ही मंजूर करत आहोत. अशा कुणाला शिव्या देऊन आणि आता आणखी भानगडी करून काय फायदा आहे? आमचा जो लढा आहे, कुणबी ज्यांना तुम्ही घुसवले आहे, त्यांच्याविरोधात आमचा लढा आहे. बाहेर कोर्टात सुरूच राहणार आहे", अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली.
ADVERTISEMENT