जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंवरच चिडले, म्हणाले, “दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा…”
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 27 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुनावलं.
ADVERTISEMENT

Kalwa Hospital News : कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. यावरून ठाण्यातील राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातच हे घडल्याने विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले. त्यानंतर शिंदेंनी विरोधकांना उत्तर दिलं. पण, आता जितेंद्र शिंदेंवर चिडलेत. त्यांनी काय म्हटलंय तेच वाचा…
कळव्यातील रुग्णालयात तीन चार दिवसांत 27 पेक्षा जास्त रुग्ण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडले. त्यानंतर मंगळवारी (15 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर माध्यमांशी बोलताना विरोधकांना सुनावले.
वाचा >> ‘खोके-खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर…’, राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंकडे बोट
शिंदे म्हणाले की, “विरोधकांनी या घटनेचे राजकारण करू नये. तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करू नये.” शिंदेंच्या याच विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भडकले.
जितेंद्र आव्हाड यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर
कळवा रुग्णालय भेटी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जितेंद्र आव्हाडांच नाव घेता काही विरोधक जाणीवपूर्वक मृत्यूचं राजकारण करत असल्याची टीका केली. त्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला देतांनाच त्यांच्यावर पलटवार केलाय.