Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम'! जरांगेंचा प्लॅन तयार

मुंबई तक

ADVERTISEMENT

मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण समर्थकांना काय मेसेज दिला?
मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीत मांडली लोकसभा निवडणुकीबद्दलची भूमिका.
social share
google news

Manoj Jarange Patil Lok Sabha elections 2024 : (गौरव साळी, अंतरवाली सराटी) मनोज जरांगे पाटील यांनी यांनी आज अंतरवाली सराटी गावात महाबैठक घेतली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण समर्थकांसमोर मोठी घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचे, याबद्दलचा संपूर्ण प्लॅन मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला. (Manoj Jarange Patil meeting Latest Update and speech)

मनोज जरांगे म्हणाले, "आपण इथे सरकारची इच्छा पूर्ण करायला आलेलो नाही. आपल्या लेकरांची इच्छा पूर्ण करायला आलो आहोत. आपण गाफील राहावं ही सरकारची भूमिका आहे."

"सगळ्या पक्षातील मराठे स्वतःच्या लेकरांसाठी एकत्र आले आहेत, मग ते सत्ताधारी असो वा विरोधी. सगळ्यांना आशा होती की शिंदे साहेब करू शकतात, पण तुम्ही सुद्धा विधान भवनात आमच्याविरोधात गरळ ओकली आणि करेक्ट कार्यक्रम कार्यक्रम करू म्हणून सांगितलं", असे म्हणत जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जरांगे म्हणाले, "काही गरज नसताना तुम्ही मराठ्यांची लाट अंगावर घेतली. मी मराठ्यांना सांगायचो की, आरक्षण देतील, तर शिंदे साहेबच. कुणी मिठाचा खडा टाकला माहिती नाही, शेवटी मीटिंगही होऊ दिली नाही."

लोकसभा निवडणुकीबद्दल जरांगे पाटील काय म्हणाले?

"सगळ्यांनी ठरवलं... हा निर्णय माझा नाही. मराठा समाज माझा मालक आहे. जास्त फॉर्म भरले तर आपणच अडचणीत येऊ. राजकारण माझा मार्ग नाही. पुढेही राजकारणात येणार नाही. पण, निर्णय घ्यायचा तर याच बैठकीत घ्यायचा आहे."

ADVERTISEMENT

"तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत. आपल्याला लोकसभा निवडणुक हा समुद्रासारखा विषय आहे. गांभीर्याने विचार करा. हुशारीने विचार करा. भावनिक होऊन पाऊल उचलून समाजाची हार होता कामा नये. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, मी काहीही सांगणार नाही. पण चार शब्द सांगतो."

ADVERTISEMENT

"कित्येक खासदार गेले. आताची स्थिती अशी आहे... ४८ नाही.. १७ ते १८ मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व आहे. शंभर टक्के हे खरं आहे, इथे कुणाचाही कार्यक्रम होऊ शकतो. मी म्हणणार नाही की, ४८ मतदारसंघ मराठ्यांचे आहेत. पण, मराठा बहुल जवळपास १७ ते १८ मतदारसंघ आहेत. तिथे कुणीच निवडून येऊ शकत नाही आणि जर मराठ्यांनी तो निर्णय घेतला तर बाकीचे दलित मुस्लीम बांधवही तुमच्यासोबत राहणार आहेत."

"नुसत्या मराठ्यांच्या जोरावरच १७-१८ निघू शकतात. पण, आपला विषय केंद्रात नाही. आपला विषय राज्यात आहे. आपल्या गुन्हे राज्य सरकार दाखल करत आहे. राज्य सरकार आपल्याला आरक्षण देत नाही. माध्यमांना त्रास कोण देतंय तर राज्य सरकार."

"दोन पर्याय करा. लोकसभेचा विषय... इतके फॉर्म भरून आपला समाज अडचणीत येऊ शकतो. ती किचकट प्रक्रिया आहे. कुणाचे फॉर्म उडतील. कुणाचे राहतील. जाणूनबुजून सरकार उडवेल. पुन्हा समाज अडचणीत येईल. सगळे फॉर्म भरत राहिले तर आपली मते विखुरली जातील. ज्याचे साधायचे नाही, पुन्हा त्याचेच साधेल."

"एक पर्याय करा... एकतर अपक्ष म्हणून एकच फॉर्म जिल्ह्यातून टाका. तो निर्णय तुम्ही घ्यायचा, मी घेणार नाही. कोण द्यायचा, काय द्यायचा. याला दुसरा पर्याय आपण अर्ज न भरता मराठा समाजाने कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं की, सग्यासोयऱ्यांच्या अंमलबजावणीबद्दल तू आवाज उठवणार का? त्याच्याकडून लिहून घ्यायचं आणि त्याला पाठिंबा द्यायचा. मग पक्ष कोणताही असो. आपल्याला पक्षाचा भेद नको. आपल्याला डाग लागायचं काम नको. हे नको असेल, तर हे नको."

"आपण कोणाच्याही सभेला जायचे नाही. मराठ्यांनी यावेळी शंभर टक्के मतदान करायचे. कोणत्याही पक्षाच्या प्रचारसभेला जायचे नाही. तुमचे मत असेल की, जिल्ह्यात एक अपक्ष उमेदवार उभा करायचा असेल तर तुम्हाला गावाकडे जावे लागेल. गावात मराठ्यांची बैठक घ्यावी लागेल. एक उमेदवार द्यायचा, गावाला मान्य आहे का? चार दिवसात मला उत्तर द्यायचं."

"अपक्ष उमेदवार फक्त मराठ्यांचेच द्यायचे नाही, तर सगळ्या जाती धर्माचे द्यायचे. दलित बांधव असेल, मुस्लीम बांधव असेल, धनगर बांधव असेल, वंजारी बांधव असेल, बारा बलुतेदार असतील... सगळ्यांचे द्यायचे. याची जिरवायची म्हणल्यावर मराठ्यांनी जात न बघता मतदान करायचं", असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

मनोज जरांगे काय म्हणाले, जाणून घेण्यासाठी पहा व्हिडीओ...

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT