Weather Report: महाराष्ट्रात पावसाचा अचानक ब्रेक, वरूणराजा बरसणार की नाही? मान्सूनबाबत IMD चा मोठा अंदाज
Maharashtra Weather Update: अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सक्रिय हवामान प्रणाली नसल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला. जाणूनघ्या पुढील काही दिवस पाऊस येणार की नाही.
ADVERTISEMENT

मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. कोकण, घाटमाथा, मुंबई, ठाणे, पालघर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली होती. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने ब्रेक घेतला असून, काही ठिकाणी तुरळक सरी वगळता फारसा पाऊस होताना दिसत नाही.
नेमकं असं का घडलं? मान्सून अचानक का कमकुवत झाला? ढग महाराष्ट्राऐवजी ईशान्य भारताकडे का सरकत आहेत? जुलै महिनाभर हीच परिस्थिती राहणार का? आणि पाऊस नसतानाही उकाडा एवढा का वाढला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं हवामान परिस्थिती आणि IMD च्या अंदाजातून समोर येतात.
महाराष्ट्राभोवती कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली नाही
सॅटेलाइट प्रतिमांचा अभ्यास केला असता महाराष्ट्राच्या आसपास कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली (Weather System) सक्रिय नसल्याचे स्पष्ट दिसते. अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर सध्या कमी दाबाचा पट्टा, चक्रीय अभिसरण किंवा अन्य कोणतीही पावसाला पोषक प्रणाली तयार झालेली नाही.
हे ही वाचा>> Maharashtra Weather : वातावरण फिरलं, काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, IMD चा अंदाज
याशिवाय बंगालच्या उपसागरातही महाराष्ट्राकडे ओलावा खेचून आणणारी प्रभावी प्रणाली नसल्याने राज्यात ढगांची निर्मिती कमी होत आहे. परिणामी, राज्यात व्यापक स्वरूपाचा पाऊस होत नसल्याचे चित्र आहे.










