हनिमूनच्या पहिल्या रात्रीच नवऱ्याला फुटला घाम; धावत-धावत वडिलांकडे आला, “माझी बायको...”
मध्यप्रदेशातील राजगढमध्ये लग्नाच्या दिवशी नवरीकडून नवऱ्याला एक असं सरप्राइज मिळालं, ज्यामुळे त्याला आश्चर्याचा धक्काच बसला आणि अक्षरश: घाम फुटला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीकडून नवऱ्याला मिळालं सरप्राइज

हनिमूनच्या पहिल्या रात्री नवऱ्याला फुटला घाम

हनिमूनच्या त्या रात्री नेमकं काय घडलं?
MP News: मध्यप्रदेशातील राजगढमधून सर्वांना चकित करुन टाकणारी बातमी समोर आली आहे. एका सामान्य कुटुंबातील तरुणाचं मोठ्या धुमधडाक्यात लग्न झालं. मात्र लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याला एक असं सरप्राइज मिळालं, ज्यामुळे त्याला आश्चर्याचा धक्काच बसला आणि अक्षरश: घाम फुटला. असं सरप्राइज मिळाल्यानंतर तो धावत वडिलांकडे गेला आणि म्हणाला, “पप्पा... आपण तर लुटलो”. नवरदेवाला नेमका कोणता आश्चर्याचा धक्का बसला? सविस्तर जाणून घ्या.
लग्नासाठी 2 लाखांची मागणी
बंकपुरा गावातील रामगोपाल नावाच्या एका तरुणाचं बऱ्याच वर्षांपासून लग्न जमत नव्हतं. त्याचा कुटुंबाला याबाबतीत सतत काळजी वाटायची. त्यावेळी गोकुळ वर्मा नावाचा एक व्यक्ती गावात पोहोचली. त्यावेळी गोकुळने रामगोपालच्या वडिलांना एका मुलीचा फोटो दाखवला आणि त्यांच्या कुटुंबियांना रोमगोपालसाठी ती मुलगी आवडली.
लग्न जुळवताना मुलीचे वडील हरीश यांनी त्या दोघांच्या लग्नासाठी तब्बल 2 लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी रामगोपालच्या वडिलांनी दागिने विकून कशी तरी 2 लाखांची जोडणी केली. त्यानंतर गोकूळ आणि जमनालाल यांनी लग्नाची तारीख ठरवली. ब्यावरा येथील अंजनी लाल मंदिरात लग्न करण्याचं ठरवण्यात आलं.
मंदिरात झालं लग्न
23 एप्रिल रोजी वधु दिव्या भगनानी आणि वर रामगोपाल हरीश यांच्यासोबत मंदिरात पोहचले. कोर्टात लग्नाची औपचारिकता पार पाडल्यानंतर मंदिरामध्ये संपूर्ण विधी आणि परंपरेनुसार, लग्न संपन्न झालं. त्यावेळी दोघांनी एकमेकांना हार घालून, सात फेरे घेतले आणि लग्नाचे सर्व विधी पूर्ण केले. याच दरम्यान, राम गोपालचे वडील गोकुळ आणि जमनालाल यांना दोन लाख रुपये देतात.
हे ही वाचा: पतीने दिली समोशाची ऑर्डर, पत्नी वॉशरूमधूनच झाली गायब.. लग्नाच्या 10 व्या दिवशीच काय घडलं?
पाठवणीची वेळ आल्यानंतर...
पाठवणीची वेळ जवळ येताच, नवरीला बाथरुममध्ये घेऊन जायचं असं सांगून गोकुळ आणि जमनालाल नवरीला तिथून घेऊन गेले. नवऱ्या मुलाचे पाठवणीच्या तयारीत व्यस्त होते. मात्र त्यावेळी जमनालाल आणि गोकुळ वधुला घेऊन तिथून पळून गेले.
हे ही वाचा: मुंबईची खबर: “शाळा बॉम्बने उडवून टाकू…” अवघ्या मुंबईत खळबळ उडवून देणारी बातमी
बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही वधू परत आली नाही आणि त्या वेळी मुलाच्या कुटुंबियांना त्यांची फसवणूक झाल्याचा संशय आला.
राम गोपाल यांनी त्यांच्या कुटुंबासह तातडीने ब्यावरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी ती फसवणूक करणारी नवरी मुलगी, गोकुळ वर्मा आणि जमनालाल वर्मा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तिघांच्या शोधासाठी छापे टाकले जात असून अद्याप कोणताही सुगावा हाती लागला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.