जावई सासूसोबत नाही तर तिच्या 'सुनेसोबत' गेला पळून, बायकोला म्हणाला, तुझी वहिनी जरा जास्तच...
काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती आपल्या सासूसोबत पळून गेल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता उत्तरप्रदेशमध्ये एक तरूण आपल्या पत्नीच्या वहिनीसोबत पळून गेल्याची घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशात सासू आणि जावई पळून गेलेल्या प्रकरणाची बरेच दिवस चर्चा सुरू होती. मुलीच्या लग्नाच्या एक आठवडा आधी सासू तिच्या होणाऱ्या जावयासोबतच पळून गेलेली. मात्र, नंतर दोघांनीही पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं होतं. ही सगळी घटना ताजी असतानाच आता एक अशाच स्वरुपाची घटना घडली आहे. ज्यामध्ये लग्नाच्या एका महिन्यानंतरच पती हा पत्नीच्या वहिनीसोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुणाचं त्याचा मेव्हण्याच्या बायकोवरच जीव जडला. त्यामुळे स्वत:च्या पत्नीला सोडून तो तिच्या वहिनीलाचा घेऊन पळून गेला. या प्रकरणी पीडित पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील गोंड जिल्ह्यातील धानेपूर पोलीस स्टेशन परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा>> आधी पतीला भेटली, नंतर OYO हॉटेलमध्ये भलत्याच पुरुषासोबत गेली; पण दिराने सगळा खेळच...
असे सांगितले जात आहे की, जो तरुणाने आपल्या मेव्हुण्याच्या बायकोसोबत पळून गेला, त्याच्या लग्नाला फक्त एकच महिना झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात 6 मे रोजी तरुणाचे लग्न झालेले. लग्नादरम्यानच तरुणाची आपल्या मेव्हण्याच्या बायकोशी नजरानजर झाली आणि तिथेच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. ज्यानंतर मेव्हण्याच्या बायकोने पळून जाण्याचा कट रचला.
'माझ्या वहिनीसोबत पती पळून गेला', नवविवाहित महिलेची पोलिसात तक्रार
पोलीस तक्रारीनुसार, 7 जून रोजी तरुण पत्नीच्या वहिनीसोबत पळून गेला. याबाबत जेव्हा नवविवाहित महिलेला समजलं तेव्हा तिने तात्काळ धानेपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ज्यामध्ये तिने सांगितले की. गेल्या महिन्यात 6 मे रोजी धानेपूर येथे एका गावात तिचं लग्न झालं होतं. तिच्या वडिलांनीही त्यांच्या ऐपतीनुसार, पैसा आणि हुंडा दिला होता. लग्नानंतर महिला सासरी आली. पण तिचा पती आणि इतर सासरच्या लोकांनी कमी हुंडा आणल्याबद्दल तिला टोमणे मारण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा>> 'राजा'सारखंच वीरूला संपवलं... लव्ह मॅरेज केलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीनेच उशीने तोंड दाबून...
नवविवाहित महिलेचे आरोप करण्यात आले
नवविवाहित महिलेने यावेळी असाही आरोप केला की, तिच्या सासरकडील लोकांनी तिला अपशब्द वापरत मारहाणही केली. 30 मे रोजी तिच्या सासरकडील लोकांनी तिला मारहाण केली आणि तिचं माहेर असलेल्या नजीकच्या बाजारात तिला सोडून दिलं. त्यानंतर ती कशीबशी तिच्या माहेरी पोहोचली आणि उपचार घेतले. यानंतर पीडित महिलेने पोलिसांना असंही सांगितले की तिचा पती तिला सोडून तिच्या वहिनीसोबत कुठेतरी पळून गेला आहे. तसंच तिनेही असंही म्हटलं की, पती नेहमी माझ्या भावाच्या बायकोचं म्हणजे वहिनीचं कौतुक तिच्याकडे करायचा. ती कशी चांगली आहे हे तो बोलत असायचा.
आता या प्रकरणी तिने पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. या प्रकरणी, पोलिसांनी तक्रार मिळाल्याचे देखील सांगितले आहे. ज्यानंतर पोलिसांनी दोन्हीकडील मंडळींना बोलावलं. त्यानंतर दोन्ही बाजूंनी सामंजस्याने यावर मार्ग काढू अशी सहमती दर्शविली आहे.