Trimbakeshwar Controversy : काय आहे तुकाराम पालखीचं दर्गा कनेक्शन?

मुंबई तक

trimbakeshwar temple incident : त्र्यंबकेश्वर मंदिरात संदल वेळी धूप दाखवण्यावरून वाद झाला. राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आणि यानिमित्ताने संत तुकाराम महाराज आणि हजरत सय्यद अनगडशाह बाबा यांच्यातील भक्ती संगम चर्चेत आलाय.

ADVERTISEMENT

Trimbakeshwar temple incident : the Bhakti Sangam between Sant Tukaram Maharaj and Hazrat Syed Angadshah Baba came into the news.
Trimbakeshwar temple incident : the Bhakti Sangam between Sant Tukaram Maharaj and Hazrat Syed Angadshah Baba came into the news.
social share
google news

संदल मिरवणुकीदरम्यान धूप दाखविण्याच्या प्रकरणामुळे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर चर्चेत आहे. गावकऱ्यांनी ही अनेक वर्षांपासूनची परंपरा असल्याचं म्हटलं आहे, दुसरीकडे यावरून राजकारणही होताना दिसत आहे. मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली गेली, तर दुसरीकडे सर्वच प्रमुख नेत्यांनी धूप दाखविण्याची परंपरा पूर्वापार असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्वधर्म समभाव ही फार जुनी परंपरा राहिली आहे. ज्याची अनेक उदाहरणं ही आपल्याला पाहायाला मिळतात. पण आपण अशा दोन उदाहरणांबाबत जाणून घेणार आहोत की, जी अशा वादांना फाटा देऊन समाजातील एकोपा टिकवून ठेवायला मदत करतात.

तुकोबारायांच्या पालखीचा अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात मुक्काम

वारकरी सांप्रदाय हा महाराष्ट्रातील सर्वात जुना सांप्रदाय आहे. या सांप्रदायाने कायमच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राची आध्यात्मिक जडणघडण घडवली आहे. संत परंपरेचा वारसा लाभलेल्या या महाराष्ट्रात वारकरी सांप्रदाय आपल्या चालीरीतींमधून समाजासमोर नेहमीच आदर्श निर्माण करत आलाय. या सांप्रदायाची सर्वधर्म समभावाची एक शिकवण देखील आजच्या समाजकंठकांना एक प्रकारचं जळजळीत अंजनच आहे.

एकीकडे सध्या धर्माधर्मात तेढ निर्माण होत असला तरी दुसरीकडे वारकरी सांप्रदाय हा आपल्या ‘बोले तैसा चाले’ या उक्ती प्रमाणेच कृती करत असल्याचं पाहायला मिळतं. याची सुरुवात ही तुकोबा महाराजांच्या पालखीपासून सुरू होते.

हेही वाचा >> त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न?, फडणवीसांकडून थेट SIT चौकशीचे आदेश

आषाढी एकादशीसाठी तुकोबा महाराजांची जेव्हा पालखी देहूमधून निघते तेव्हा ती सगळ्यात आधी जवळच्या अनगडशाह बाबा यांच्या दर्गात जाते. इथे असलेल्या दर्ग्यासमोरील मेघडंबरीत तुकोबारायांची पालखी ठेवली जाते. ही मेघडंबरी ही अभंग आरती स्थान म्हणून ओळखलं जातं.

हे वाचलं का?

    follow whatsapp