नुपूर शर्मांचं समर्थन केल्याने झालेल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातला सातवा आरोपी अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमरावतीमधले मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. २१ जूनला ही घटना घडली. या प्रकरणात आता पोलिसांनी सातव्या आरोपीला अटक केली आहे. शेख इरफान शेख रहिम असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांचं समर्थन उमेश कोल्हे यांनी केलं होतं त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली.

या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. सातवा आरोपी फरार होता, त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. २१ जूनला कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर उमेश कोल्हे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर ही घटना घडली.

नुपूर शर्मांचं समर्थन केल्याने अमरावतीचे व्यावसायिक उमेश कोल्हेंची हत्या? वाचा सविस्तर

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

राजस्थानच्या उदयपूरमध्ये जी कन्हैय्या शर्माच्या हत्येची घटना समोर आली तशीच घटना महाराष्ट्रातल्या अमरावतीत झाली आहे. मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी चायनीज सुरा मारून केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

उमेश कोल्हे यांचा मुलगा आणि सुनेच्या समोरच ही घटना घडली. उमेश कोल्हे यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर आता उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं होतं म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप होऊ लागला आहे. नुपूर शर्माला समर्थन देणारी पोस्ट उमेश कोल्हे यांनी त्यांच्या स्टेटसवर ठेवली होती असंही समोर येतं आहे.

ADVERTISEMENT

भाजपनेही या प्रकरणी एनआयने लक्ष घालावं अशी मागणी केली. भाजपचे स्थानिक नेते त्याचप्रमाणे नितेश राणे यांनीही ट्विट करत महाराष्ट्रातही उदयपूरसारखी एका मेडिकल व्यावसायिकाची हत्या घडवून आणली गेली असं ट्विट केलं आहे. उमेश कोल्हे यांच्या गळ्यावर वार करून त्यांची २१ जूनला हत्या करण्यात आली होती. ही हत्या नुपूर शर्मा प्रकरणाशी संबंधित आहे का? याचा काटेकोर तपास करावा अशी मागणी भाजपच्या शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांनी तपासही सुरू केला. मात्र तसा काही अँगल समोर आला नाही असं म्हटलं होतंय तर दुसरीकडे या प्रकरणी एनआयचे अधिकारी अमरावतीत दाखल झाले आहेत. या प्रकरणी आता पोलिसांनी नुपूर शर्मा प्रकरणामुळेच ही हत्या झाल्याचं म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT