VIP गेस्टला 'एक्स्ट्रा सर्व्हिस' न दिल्याने झालेली अंकिता भंडारीची हत्या, माजी BJP नेत्याचा मुलाला जन्मठेप

मुंबई तक

बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरणात (Ankita Bhandari Murder Case) न्यायालयाने तिन्ही आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय तिघांनाही 50,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

VIP गेस्टला 'एक्स्ट्रा सर्व्हिस' न दिल्याने झालेली अंकिता भंडारीची हत्या
VIP गेस्टला 'एक्स्ट्रा सर्व्हिस' न दिल्याने झालेली अंकिता भंडारीची हत्या
social share
google news

ऋषिकेश (उत्तराखंड): बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरणात (Ankita Bhandari Murder Case) कोटद्वार जिल्हा न्यायालयाने  निकाल दिला आहे. सुमारे 2 वर्षे 8 महिन्यानंतर हा निकाल आला आहे. न्यायालयाने या हत्या  प्रकरणात माजी भाजप नेत्याचा मुलगा पुलकित आर्य त्याचे साथीदार सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता या तिघांना दोषी ठरवले आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यासोबतच तिघांनाही 50,000 रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.

या प्रकरणात हायप्रोफाइल लोकांची नावे आल्याने ही घटना चर्चेत आली. VIP लोकांची नावं समोर आल्यानंतर, या प्रकरणात अनेक वळणे आली. 500 पानांच्या आरोपपत्रासोबतच या प्रकरणात 97 साक्षीदारही सादर करण्यात आले.

कोर्टाने काय दिला निर्णय?

खरं तर, या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी सकाळी 10.30 वाजता कोटद्वारच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात सुरू झाली. संपूर्ण देशाचे लक्ष या निर्णयावर लागले होते. सध्या तिन्ही आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तिघांनाही 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात, पुलकित आर्यवर IPC कलम 302 (खून), 201 (पुरावे नष्ट करणे), 354 A (लैंगिक छळ) आणि अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गंभीर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्याच वेळी, इतर दोन आरोपींवर हत्येत मदत करणे आणि अनैतिक कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.

97 साक्षीदार - 500 पानांचं आरोपपत्र

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT(विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली होती. SIT ने 500 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या संपूर्ण घटनेत 97 साक्षीदारांची नावे देखील होती, त्यापैकी सरकारी वकिलांनी त्यांच्या वतीने 47 साक्षीदार सादर केले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

18 सप्टेंबर 2022 रोजी अंकिता भंडारी अचानक गायब झाली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण सुरू झाले. 19 वर्षीय अंकिता ऋषिकेशमधील वनंतरा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. 18 सप्टेंबर रोजी ती अचानक गायब झाली. वडिलांनी रिसॉर्टमध्ये पोहोचून याबद्दल चौकशी केली, पण ती सापडली नाही. त्यानंतर वडिलांनी मुलीची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. संशयाच्या आधारे पोलिसांनी रिसॉर्ट मालक पुलकित आर्यची चौकशी केली, त्यानंतर त्याने सांगितले की अंकिता मानसिक तणावातून जात होती.

पुलकितने रचलेली भलतीच कहाणी

पुलकितने पोलिसांना सांगितले की, मानसिक ताणतणावामुळे अंकिता 18 तारखेला तिच्या मैत्रिणींसोबत ऋषिकेशला गेली होती आणि रात्री उशिरा तिच्या खोलीत परत गेली आणि झोपली. पण 19 सप्टेंबर रोजी सकाळी ती तिच्या खोलीतून गायब होती. पण पोलिसांना यावर विश्वास बसला नाही आणि त्यांची शंका अधिकच वाढू लागले.

शंका दूर करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले

पुलकितचे म्हणणे ऐकल्यानंतर पोलिसांनी रिसॉर्ट कर्मचाऱ्यांची चौकशी केली. रिसॉर्ट कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अंकिता त्यांच्यासोबत गेली होती पण ती परत आली नाही. याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी ऋषिकेशला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व मार्गांवर लावलेले सीसीटीव्ही तपासले. या तपासात असे समोर आले की अंकिता रिसॉर्टमध्ये परतलीच नव्हती.

कालव्यात सापडला मृतदेह 

पुलकितची कहाणी आता पोलिसांसमोर उघड झाली आणि आता त्याची कडक चौकशी करण्यात आली. अंकिताचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावरही अनेक प्रकारच्या मोहिमा चालवल्या जात होत्या. पोलिसांच्या चौकशीसमोर पुलकित फार काळ टिकू शकला नाही आणि त्याने सांगितले की त्यानेच अंकिताला गंगेत ढकलले. त्यानंतर ऋषिकेशजवळील चिल्ला कालव्यात अंकिताचा मृतदेह सापडला होता.

पोलीस तपासात ही मोठी माहिती समोर आली

पोलीस तपासात पुलकितसोबत त्याच्या दोन साथीदारांची नावेही समोर आली. प्रत्यक्षात, पुलकित अंकितावर चुकीचे काम करण्यासाठी दबाव आणत असे. रिसॉर्टमध्ये काम करताना, पुलकितने अंकिताला तेथील 'VIP' पाहुण्यांना 'एक्स्ट्रा सर्व्हिस' देण्यास भाग पाडले होते, ज्याचा तिने विरोध केलेला. यामुळे संतप्त झालेल्या पुलकितने त्याच्या दोन साथीदारांसह अंकिताला चिल्ला कालव्यात ढकलून तिची हत्या केली होती. 

जमावाने जाळून टाकलेला रिसॉर्ट 

अंकिता हत्येचा खटला उघडकीस येताच संपूर्ण उत्तराखंडमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्यानंतर संतप्त जमावाने पुलकित आर्य याच्या रिसॉर्टला आग लावली होती. स्थानिक भाजप आमदार रेणू बिष्ट यांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढता गोंधळ पाहून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अंकिता हत्या प्रकरणासाठी एसआयटी स्थापन केलेली. तसेच पुलकितचे रिसॉर्ट बुलडोझरने पाडून टाकण्यात आले होते.

पुलकितच्या वडिलांची पक्षातून हकालपट्टी

या हत्येवरून संपूर्ण उत्तराखंड राज्यात संताप निर्माण झाला होता. त्यानंतर भाजपने पुलकितचे वडील विनोद आर्य यांची पक्षातून हकालपट्टी केलेली. विनोद आर्य हे भाजप नेते होते आणि त्यांनी उत्तराखंड सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं होतं. आर्य हे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते आणि उत्तर प्रदेशच्या सह-प्रभारीची जबाबदारीही सांभाळत होते. पुलकितचा भाऊ अंकित आर्य यांना उत्तराखंड ओबीसी कल्याण आयोगाच्या उपाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले. त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा होता.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp