भाजप नेत्या पंकजा मुंडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईतल्या घरी क्वारंटाईन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा वाढतो आहे. अशातच महाराष्ट्रातल्या सरकारमधले मंत्री विरोधी पक्षातले नेते यांनाही कोरोनाची बाधा होते आहे. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांना कोरोना झाला आहे. पंकजाताईंनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मुंबईतील निवासस्थानी आपण क्वारंटाईन झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच प्रकृती चांगली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे पंकजा मुंडे यांचं ट्विट?

‘Corona बाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्याबरोबर मी विलग झाले आहे.. चाचणी केली…लक्षणं आणि Corona दोन्ही आहे… सर्वानी काळजी घ्यावी..’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंकजा मुंडे या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील धमधम इथं एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. भगवानबाबा यांच्या मंदिराचा कलश रोहणासाठी त्या हेलिकॉप्टरने धमधममध्ये पोहोचल्या होत्या. या कार्यक्रमात भाषण केल्यानंतर त्यांनी त्यांना भूक लागल्याचं सांगितलं. तसंच आपण कुठल्या बंद खोलीत जेवणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर उपस्थित लोकांसोबतच त्यांना स्टेजवर जेवण वाढण्यात आलं होतं. त्यानंतर चार दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आता चिंता वाढली आहे.

महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला-पंकजा मुंडे

ADVERTISEMENT

एप्रिल 2021 मध्येही पंकजाताई झाल्या होत्या कोरोना पॉझिटिव्ह

ADVERTISEMENT

एप्रिल 2021 मध्ये पंकजा मुंडे यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यावेळी त्यांनी आपली प्रकृती चांगली असून घरीच उपचार सुरु असल्याची माहिती दिली होती. माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असं ट्विट त्यांनी त्यावेळी केलं होतं.

वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर…

काय म्हणाले अजित पवार?

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता अधिक कठोर निर्बंध लावण्यात येतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे हिवाळी अधिवेशनानंतर पाच दिवसांत 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदार पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे, असं आवाहनही अजित पवारांनी केलं आहे.

आत्तापर्यंत कुणाकुणाला कोरोनाची बाधा?

सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी

वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

यशोमती ठाकूर, महिला आणि बालकल्याण मंत्री

बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

के.सी. पाडवी, आदिवासी विकास मंत्री

प्राजक्त तनपुरे, उर्जा राज्यमंत्री

राधाकृष्ण विखे पाटील, भाजप नेते

हर्षवर्धन पाटील, भाजप नेते

डॉ. दीपक सावंत, माजी आरोग्यमंत्री, शिवसेना नेते

समीर मेघे, भाजप आमदार

    follow whatsapp

    ADVERTISEMENT