रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कहर! जगबुडी, काजळी नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

मुंबई तक

-राकेश गुडेकर, रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात आजही पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. मध्यरात्रीपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला. गुहागर, दापोली, खेड, चिपळूणमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. तर दक्षिण भागात म्हणजेच संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूरमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 182.56 मिमी पावसाची नोंद झाली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

-राकेश गुडेकर, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात आजही पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. मध्यरात्रीपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला. गुहागर, दापोली, खेड, चिपळूणमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. तर दक्षिण भागात म्हणजेच संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूरमध्ये पावसाचा जोर अधिक आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत 182.56 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दापोली, मंडणगड, गुहागर, चिपळूण, लांजा या 5 तालुक्यांत 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. लांजा तालुक्यामध्ये 290 मिमी, मंडणगडमध्ये 200, दापोली 220, गुहागर आणि चिपळूणमध्ये 205 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जगबुडी, काजळी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

खेडमधील जगबुडी नदी आणि लांजा तालुक्यातील काजळी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर संगमेश्वरमधील शास्त्री, बावनदी आणि राजापूरमधील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp