Independence Day: कुणी आयुष्य वेचलं, कुणी बलिदान दिलं! ‘हे’ आहेत स्वतंत्र भारताचे १० युद्धवीर
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जातो आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य संग्रामात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी जी चळवळ उभी केली त्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही पाच मोठी युद्धं झाली जेव्हा आपल्या देशातल्या शेकडो वीरांनी […]
ADVERTISEMENT

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जातो आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य संग्रामात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी जी चळवळ उभी केली त्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही पाच मोठी युद्धं झाली जेव्हा आपल्या देशातल्या शेकडो वीरांनी बलिदान दिलं.
देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या लष्कराने पाच युद्धं केली
आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाची फाळणी झाली. भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्मिले गेले. मात्र तेव्हापासून पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढणं सुरू केलं. भारताकडे जेव्हा आपल्या शेजारी देश असलेल्या चीन आणि पाकिस्तानने वाकडी नजर करून पाहिलं तेव्हा तेव्हा आपण त्यांना जशास तसं उत्तर दिलं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या सैन्याने एकूण पाच युद्ध केली. त्यातली चार पाकिस्तानसोबत झाली तर एक चीनसोबत झालं.
भारतात झालेली पाच प्रमुख युद्ध कुठली आहेत?
पहिलं युद्ध- १९४७-४८ भारत आणि पाकिस्तान यांच्यात हे युद्ध झालं. हे युद्ध ४४१ दिवस सुरू होतं
दुसरं युद्ध-१९६२- हे युद्ध भारत आणि चीन दरम्यान झालं जे ३२ दिवस सुरू होतं