राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग लवकर सुरू होणार? जाणून घ्या काय म्हणाले राजेश टोपे
कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. शाळा सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी असे शाळांचे वर्ग आधीच सुरू आहेत. आता पहिलीपासूनचे वर्गही सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. ग्रामीण भागातले शिक्षक, शाळा चालक, पालक अशी सगळेच जण यासाठी आग्रही आहेत. त्यानंतर चाईल्ड टास्क फोर्सनेही पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग […]
ADVERTISEMENT

कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. शाळा सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी असे शाळांचे वर्ग आधीच सुरू आहेत. आता पहिलीपासूनचे वर्गही सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. ग्रामीण भागातले शिक्षक, शाळा चालक, पालक अशी सगळेच जण यासाठी आग्रही आहेत. त्यानंतर चाईल्ड टास्क फोर्सनेही पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास संमती दिली आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
मोठी बातमी! 4 ऑक्टोबरपासून मुंबईतल्याही शाळा सुरू होणार
काय म्हणाले राजेश टोपे?
चाईल्ड टास्क फोर्सने स्पष्टपणे सांगितले आहे की पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयोगटामार्फत विषाणू परसरण्याची शक्यता आहे. मात्र १२ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणानंतर शैक्षणिक संस्थामध्ये जाण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. तसेच पहिली ते चौथीचे वर्ग सर्व अटीशर्थींसह सुरु करण्याची परवानगी देण्याची सूचना चाईल्ड टास्क फोर्सने केली आहे. याबाबत विचार सुरु असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.