Malik vs Wankhede : नवाब मलिकांकडून हायकोर्टात बिनशर्त माफीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज बिनशर्त माफी मागितली आहे. NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी मलिकांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. या खटल्यात हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही नवाब मलिकांनी वानखेडे परिवाराबद्दल वक्तव्य केल्यानंतर हायकोर्टाने मलिकांना तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये असं विचारलं होतं. ज्यानंतर मलिकांनी ही […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज बिनशर्त माफी मागितली आहे. NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी मलिकांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. या खटल्यात हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही नवाब मलिकांनी वानखेडे परिवाराबद्दल वक्तव्य केल्यानंतर हायकोर्टाने मलिकांना तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये असं विचारलं होतं. ज्यानंतर मलिकांनी ही माफी मागितली आहे.
“सर्वात आधी मी माननीय उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागतो. २५ आणि २९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशाचं माझ्याकडून उल्लंघन झालं आहे. माझा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा किंवा तो आदेश मोडण्याचा हेतू नव्हता”, असं मलिक यांनी कोर्टासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देत असताना कोर्टाच्या आदेशाचा माझ्याकडून भंग झाल्याचं मलिक यांनी कोर्टासमोर सांगितलं आहे.
समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांचा गुगल, फेसबुक आणि ट्विटरविरोधात दावा
मुलाखतीदरम्यान मी दिलेल्या मी दिलेल्या अशा कोणत्याही प्रतिक्रीया न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या कक्षेत येत नाहीत या विश्वासाने दिल्या आहेत. परंतू यानंतर मला देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार, या खटल्यासंदर्भात मी केलेलं कोणतंही विधान किंवा मुलाखतीत दिलेली प्रतिक्रीया ही कोर्टाच्या आदेशाचा भंग करणारी आहे हे सांगण्यात आलं. त्यामुळे यापुढे मी अशा कोणत्याही प्रतिक्रीया देणार नाही असं मलिक यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.