शिवसेनेला फक्त मुख्यमंत्रिपदाची गुबगुबीत खुर्ची मिळाली, आता तरी…: चंद्रकांत पाटील
स्वाती चिखलीकर, सांगली: ‘शिवसेना ही मुख्यमंत्रीपदाच्या एका गुबगुबीत खुर्चीपुरती मर्यादित झाली असून आता शिवसेना संपत चालली आहे.’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील महापालिका प्रभाग 16 अ येथील पोटनिवडणूकच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेत बोलत होते. मंत्री जयंत पाटील यांना घेरावा घातला ही सांगलीतील स्थानिक शिवसैनिकांची भूमिका योग्यच असून जनता आणि […]
ADVERTISEMENT

स्वाती चिखलीकर, सांगली: ‘शिवसेना ही मुख्यमंत्रीपदाच्या एका गुबगुबीत खुर्चीपुरती मर्यादित झाली असून आता शिवसेना संपत चालली आहे.’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील महापालिका प्रभाग 16 अ येथील पोटनिवडणूकच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेत बोलत होते.
मंत्री जयंत पाटील यांना घेरावा घातला ही सांगलीतील स्थानिक शिवसैनिकांची भूमिका योग्यच असून जनता आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादीला वैतागले आहेत. असा टोलाही चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी लगावला आहे.
‘मुंबै बँकेत अध्यक्ष राष्ट्रवादी आणि उपाध्यक्ष भाजपाचा निवडून आला आहे. त्यामुळे आता तरी शिवसेनेला कळायला हवं की, शिवसेनेला फक्त एक मुख्यमंत्रीपदाची गुबगुबीत खुर्ची मिळाली आहे. बाकी काही मिळालं नाही. शिवसेनेला सहकार, विद्यापीठ कायदा अश्या अनेक गोष्टीची माहिती नाही.’ असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
‘मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसचा प्रचार केला काय किंवा शिवसेनेचा तरी सांगलीत भाजपचा उमेदवार निवडून येणार आहे. मात्र, सांगलीतील शिवसैनिकांनी मांडलेली भूमिका योग्य असून सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हा वैतागलेला आहे. अन् त्याचे चित्र म्हणजे जयंत पाटील यांना शिवसैनिकांनी सांगलीत घातलेला घेराव आहे.’ अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.