नऊ तास Tauktae वादळाशी झुंज देऊन सातारचा पठ्ठ्या सुखरुप घरी
तौकताई चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि मुंबईला चांगलाच फटका बसला. त्यातच अरबी समुद्रात बार्ज P 305 हे जहाज बुडाल्यामुळे काही खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. परंतू सातारचा अनिल वायचळ ९ तास अस्मानी संकटाचा सामना करत सुखरुप घरी पोहचला आहे. लाईफ जॅकेटच्या सहाय्याने ९ तास समुद्रात वादळाची झुंद देणाऱ्या अनिल वायचळ यांची नौदलाने सुटका केली आणि […]
ADVERTISEMENT

तौकताई चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि मुंबईला चांगलाच फटका बसला. त्यातच अरबी समुद्रात बार्ज P 305 हे जहाज बुडाल्यामुळे काही खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. परंतू सातारचा अनिल वायचळ ९ तास अस्मानी संकटाचा सामना करत सुखरुप घरी पोहचला आहे.
लाईफ जॅकेटच्या सहाय्याने ९ तास समुद्रात वादळाची झुंद देणाऱ्या अनिल वायचळ यांची नौदलाने सुटका केली आणि तीन दिवस अनिलची वाट पाहणाऱ्या त्याच्या घरच्यांच्या जीवात जीव आला. घरी परतल्यावर अनिलच्या घरच्यांनी औक्षण करुन त्याचं स्वागत केलं. अनिल वायचळ हे मुंबईत अँफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीत कार्यरत आहेत.अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या प्लॅन्टवर या कंपनीचे काम सुरू असल्याने वादळावेळी सहकाऱ्यां समवेत ते तिकडे ड्युटीवर कार्यरत होते.
Afcons इन्फ्रास्ट्रक्चरने सांगितलं P 305 बार्जचा अपघात नेमका कसा झाला?