देवेंद्र फडणवीस म्हणजे ‘शतरंज का बादशाह’, रावसाहेब दानवेंनी केलं कौतुक

मुंबई तक

देवेंद्र फडणवीस म्हणजे शतरंज का बादशाह आहेत असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर होती. मतदान कुणाला केलं हे दाखवायचं असूनही फडणवीसांनी सहावा उमेदवार निवडून आणला. हे त्यांचं कौशल्य आहे असंही दानवे यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीतही आघाडीचा ‘कार्यक्रम’ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देवेंद्र फडणवीस म्हणजे शतरंज का बादशाह आहेत असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर होती. मतदान कुणाला केलं हे दाखवायचं असूनही फडणवीसांनी सहावा उमेदवार निवडून आणला. हे त्यांचं कौशल्य आहे असंही दानवे यांनी म्हटलं आहे.

विधान परिषद निवडणुकीतही आघाडीचा ‘कार्यक्रम’ होणार?; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

२०१९ ला विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा शिवसेना भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र शिवसेनेने दगा केला, देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी प्रचारात सांगितलं तेव्हा शिवसेनेने काहीही म्हटलं नाही. मात्र निकाल लागला तेव्हा म्हणू लागले आमच्याकडे सगळे पर्याय खुले आहेत. शिवसेनेने दगाफटका केला आहे असा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना या ठिकाणी केला. जालन्यातल्या जल आक्रोश मोर्चामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय.

फडणवीसांबद्दल काय म्हणाले दानवे?

हे वाचलं का?

    follow whatsapp