महामोर्चा: ‘..तर त्यांचा पुढचा कार्यक्रम आपण एकत्र बसून करु’, पवारांचं खुलं आव्हान

मुंबई तक

Sharad Pawar Speech: मुंबई: ‘जर अद्यापही राज्यकर्त्यांनी धडा घेतला नाही तर पुढचा कार्यक्रम आपण एकत्र बसून करु आणि त्यांना उलथून कसं टाकायचं याचा विचार करु.’ असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांबात केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने (mahavikas aghadi) मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sharad Pawar Speech: मुंबई: ‘जर अद्यापही राज्यकर्त्यांनी धडा घेतला नाही तर पुढचा कार्यक्रम आपण एकत्र बसून करु आणि त्यांना उलथून कसं टाकायचं याचा विचार करु.’ असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांबात केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने (mahavikas aghadi) मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं होतं. याच मोर्चात भाषण करताना शरद पवार यांनी राज्यपाल कोश्यारी आणि भाजपवर तुफान हल्ला चढवला. (mahamorcha sharad pawar gave an open challenge to shinde fadnavis governemnt over governor koshyari)

शरद पवार मोर्चात सहभागी झाले नाही, पण…

महाविकास आघाडीचे सगळे दिग्गज नेते हे यावेळी रस्त्यावर उतरुन मोर्चात सहभागी झाले आणि नंतर ते सभास्थळी पोहचले. पण शरद पवारांचं वय आणि प्रकृती यामुळे त्यांनी मोर्चात न जाता सरळ सभास्थळ गाठलं. मात्र, यावेळी पवारांनी आपल्या भाषणातून मोर्चेकऱ्यांनी सरकारविरोधात कठोर भूमिका घ्यावी असं आवाहन केलं. पाहा शरद यावेळी नेमकं काय म्हणाले:

महामोर्चा: ‘हे लफंगे महाराष्ट्र लुटायला आलेत’, ठाकरेंचा तुफान हल्लाबोल

महामोर्चातील शरद पवारांचं भाषण जसंच्या तसं..

’70 वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी या मुंबई नगरीत लाखोंचे मोर्चे निघाले होते. मराठी भाषिकांचं राज्य व्हावं यासाठी अनेक तरुण पुढे आले होते. घरादाराचा विचार केला नाही, महाराष्ट्राचा विचार केला आणि शेवटी महाराष्ट्र पदरात पडला. पण तरीही अजूनही महाराष्ट्रात मराठी भाषिक जे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत ते महाराष्ट्रात येण्याचा प्रयत्न सातत्याने करतायेत. मग ते बेळगावचा मराठी माणूस असेल, निपाणीचा असेल किंवा अन्य भागातील असेल. त्या सगळ्यांचा महाराष्ट्रात समावेश व्हावा यासाठी त्यांची जी भावना आहे त्यात भावनेशी महाराष्ट्रातील मराठी माणूस अंतकरणापासून सहभागी आहे.’

हे वाचलं का?

    follow whatsapp