पोलीस चार कोटी लाच देऊन पोस्टवर आले तर ते वसुलीच करणार-देवेंद्र फडणवीस

मुंबई तक

राज्याचं हिवाळी अधिवेशन आणि त्याचा चौथा दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने गाजला. देवेंद्र फडणवीस आज महाविकास आघाडी सरकारला विविध मुद्यांवरून घेरलं. बदल्यांचं रॅकेट चाललं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत. वाझे काय लादेन आहे का? इथवर विचारणारा करून त्याची पाठराखण करण्यात आली. स्थगितीपासून खंडणीपर्यंत किती तरी प्रकरणं आत्तापर्यंत बाहेर आली आहेत याबद्दल काय बोलायचं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्याचं हिवाळी अधिवेशन आणि त्याचा चौथा दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने गाजला. देवेंद्र फडणवीस आज महाविकास आघाडी सरकारला विविध मुद्यांवरून घेरलं. बदल्यांचं रॅकेट चाललं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत. वाझे काय लादेन आहे का? इथवर विचारणारा करून त्याची पाठराखण करण्यात आली. स्थगितीपासून खंडणीपर्यंत किती तरी प्रकरणं आत्तापर्यंत बाहेर आली आहेत याबद्दल काय बोलायचं अशी स्थिती आहे असंही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मागील दोन वर्षात अनेक खंडणी प्रकरणे समोर अली आहेत. पोलीस दलाची अवस्था सुधारली गेली नाही तर हे पोलीस दल सर्वोत्तम दल म्हणून ओळखलं जाणार नाही. बदल्यांच्या घोटाळ्याची माहिती मी होम सेक्रेटरीला दिली होती. परंतु सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तो अहवाल फोडला आणि माध्यमाना दिला. जर पोलीस चार कोटी देऊन पोस्टवर येत असतील तर आपोआप ते वसुलीच करणार’

‘भाजपच्या एजंट’ असा आरोप झालेल्या रश्मी शुक्ला कोण?

हे वाचलं का?

    follow whatsapp