पुण्यासह महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट! चार दिवस मुसळधार पाऊस, IMD कडून इशारा
महाराष्ट्रातील (Maharashtra) काही जिल्ह्यांत पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुण्यासह चार जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज असून, भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगाल ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळपास चक्रीय वाऱ्याची स्थिती असून, त्याच ठिकाणी कमी दाबाच्या पट्ट्याचे डिप्रेशनमध्ये रुपांतर झालंय. याचा […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील (Maharashtra) काही जिल्ह्यांत पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुण्यासह चार जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज असून, भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगाल ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळपास चक्रीय वाऱ्याची स्थिती असून, त्याच ठिकाणी कमी दाबाच्या पट्ट्याचे डिप्रेशनमध्ये रुपांतर झालंय. याचा परिणाम म्हणून पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कोकण पट्ट्यासह विविध भागात संततधार पाऊस कोसळत असून, पुढील काही दिवस त्यात खंड न पडण्याचा अंदाज आहे.
रेड अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे
हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे ८ ऑगस्ट रोजी राज्यातील रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. IMD ने या चारही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.