मुंबईच्या कोरोनाविरोधी लढ्याला बळ देणारी बातमी! 18 महिन्यांनंतर शून्य मृत्यूची नोंद

मुंबई तक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत पूर्वपदावर येत असलेल्या देशाच्या आर्थिक राजधानी दिलासा देणारी घटना आज घडली आहे. कोरोनाविरोधात लढा देत असलेल्या मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत 18 महिन्यानंतर प्रथमच शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाच्या दोन लाटांमुळे मुंबई पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर मुंबई पुन्हा हळूहळू रुळावर येत असून, शून्य […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत पूर्वपदावर येत असलेल्या देशाच्या आर्थिक राजधानी दिलासा देणारी घटना आज घडली आहे. कोरोनाविरोधात लढा देत असलेल्या मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत 18 महिन्यानंतर प्रथमच शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोनाच्या दोन लाटांमुळे मुंबई पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर मुंबई पुन्हा हळूहळू रुळावर येत असून, शून्य मृत्यूच्या बातमीने मुंबईकरांच्या कोरोनाविरोधी लढ्यालाच बळ मिळालं आहे.

मुंबईत गेल्या 24 तासांत 367 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत 518 रुग्ण कोरोनातून बरे होऊ घरी परतले आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासांच्या कालावधीत एकही मृत्यू झाला नाही. मुंबईतील एकूण कोरोना मृतांचा आकडा 16 हजार 180 इतका झाला आहे. 24 तासांत मुंबईत 28,697 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत 109,57,392 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp