भारतात 40 कोटी जणांना कोरोना होऊन गेलाय?

मुंबई तक

भारतात आत्तापर्यंत 40 कोटी जणांना कोरोना होऊन गेलाय असा दावा न्यूयॉर्क टाईम्सने केलाय. कोरोनाची सरकारी आकडेवारी जे सांगतेय, त्यापेक्षा प्रत्यक्षातली आकडेवारी मोठी असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी सिरोसर्व्हेची मदत घेतली आहे, शिवाय अभ्यासकांच्या निरीक्षणांचाही आधार घेतलाय. पण त्यांच्या त्या मॉडेलचा वापर केला तर महाराष्ट्रातली कोरोना आकडेवारीही हादरवून सोडणारी समोर येईल. सगळ्यात पहिले जाणून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतात आत्तापर्यंत 40 कोटी जणांना कोरोना होऊन गेलाय असा दावा न्यूयॉर्क टाईम्सने केलाय. कोरोनाची सरकारी आकडेवारी जे सांगतेय, त्यापेक्षा प्रत्यक्षातली आकडेवारी मोठी असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी सिरोसर्व्हेची मदत घेतली आहे, शिवाय अभ्यासकांच्या निरीक्षणांचाही आधार घेतलाय. पण त्यांच्या त्या मॉडेलचा वापर केला तर महाराष्ट्रातली कोरोना आकडेवारीही हादरवून सोडणारी समोर येईल.

सगळ्यात पहिले जाणून घेऊया की, भारतातली सरकारी आकडेवारी किती आहे आणि न्यूयॉर्क टाईम्सच्या दाव्यानुसार प्रत्यक्षातली आकडेवारी किती असू शकते.

महामारीतल्या रुग्णांची प्रत्यक्षातली आकडेवारी समोर आलेल्या आकडेवारीपेक्षा 15 पटीने अधिक असते, मृत्यू दरही 0.15 टक्के असतो असं अभ्यासक सांगतात.

त्यामुळे या न्यायाने भारताचा विचार करायचा झालं तर भारतात 24 मेपर्यंत 40 कोटी 42 लाख जणांना कोरोना झालाय.

हे वाचलं का?

    follow whatsapp