Night curfew : राज्यात पुन्हा रात्रीची संचारबंदी?; राजेश टोपेंनी दिले संकेत

मुंबई तक

राज्यात पुन्हा एकदा रात्रीची संचारबंदी लागू होण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत आज दिले. केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी केली जाईल. याबाबतचा अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्री घेतील, असं टोपे म्हणाले. केरळमध्ये ओनम सणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. केरळात रुग्णसंख्येत विस्फोटक वाढ झाली असून, केंद्र सरकारने आगामी दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यात पुन्हा एकदा रात्रीची संचारबंदी लागू होण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत आज दिले. केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी केली जाईल. याबाबतचा अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्री घेतील, असं टोपे म्हणाले.

केरळमध्ये ओनम सणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. केरळात रुग्णसंख्येत विस्फोटक वाढ झाली असून, केंद्र सरकारने आगामी दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्राकडून काही उपाययोजनाही सूचवण्यात आलेल्या आहेत.

केंद्राकडून स्थानिक पातळीवरील निर्बंध तसेच रात्रीची संचारबंदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी टोपे यांनी रात्रीच्या संचारबंदीचे संकेत दिले.

‘केरळमध्ये ओनमनंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्राने राज्य सरकारला रात्रीच्या संचाबंदीची सूचना केली आहे. आगामी काळातील राज्यातील सण उत्सव पाहता याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी होईल. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असं राजेश टोपे म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp