नवनीत राणांना दुसऱ्यांदा अटक होणार? न्यायालयाचे आदेश, पोलिसांनी काढलं अजामीनपात्र अटक वॉरंट

विद्या

ठाकरे सरकारच्या काळात राणा दाम्पत्यांना अटक झाली. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्येही राणांवर अटकेची टांगती तलवार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आता पोलिसांनी तत्काळ अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय. त्यामुळे राणांची दिवाळी तुरुंगात तर जाणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. हनुमान चालिसेचा वाद असो की, अन्य इतर प्रकरणं. शिवसेना आणि उद्धव ठाकरे सातत्यानं राणा दाम्पत्याच्या टार्गेटवर राहिलेत. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ठाकरे सरकारच्या काळात राणा दाम्पत्यांना अटक झाली. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्येही राणांवर अटकेची टांगती तलवार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आता पोलिसांनी तत्काळ अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय. त्यामुळे राणांची दिवाळी तुरुंगात तर जाणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.

हनुमान चालिसेचा वाद असो की, अन्य इतर प्रकरणं. शिवसेना आणि उद्धव ठाकरे सातत्यानं राणा दाम्पत्याच्या टार्गेटवर राहिलेत. हनुमान चालीसा वादातच खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा या दोघांनाही अटक झाली. दोघांनाही वेगवेगळ्या तुरुंगात रहावं लागलं.

सूडबुद्धीनं ही कारवाई झाल्याचा आरोप दोघांनी त्यावेळच्या ठाकरे सरकारवर केला. पण, आता शिंदे फडणवीसांच्या काळातही राणांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. जात प्रमाणपत्रामुळे खासदारकी धोक्यात आलेली असतानाच आता शिवडी न्यायालयानं नवनीत राणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याचे निर्देश दिलेत.

नवनीत राणा : न्यायालयाने अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिलेलं प्रकरण काय?

त्याचं झालं, असं की नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत. अमरावती हा अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ आहे. पण राणांनी आपल्या वडिलांचा शाळा सोडल्याचा बनावट दाखला तयार केला आणि त्याआधारे स्वतःचं एससी प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र काढल्याचा आरोप आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp